शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पैसा जनतेचा मग मोफत कोरोना लसीचं क्रेडिट मोदी का घेतायत?, ममता बॅनर्जींचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:46 IST

Mamata Banerjee: देशातील १८ वर्षांवरील सर्वांना २१ जूनपासून कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानंतर या निर्णयाचं क्रेडिट पंतप्रधानांनी घेतल्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे.

देशातील १८ वर्षांवरील सर्वांना २१ जूनपासून कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानंतर या निर्णयाचं क्रेडिट पंतप्रधानांनी घेतल्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे. "कोरोना विरोधी लस मोफत दिल्याचं क्रेडिट पंतप्रधान मोदी का घेतायत? देशातील नागरिकांना मोफत लस मिळावी हा त्यांचा अधिकार आहे. कारण त्यासाठी लागणारा पैसा जनतेच्याच खिशातून आलेला आहे. भाजपनं खर्च केलेला नाही", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. (Citizens money why is PM taking credit for free doses asks Mamata Banerjee)

"आम्ही तर फेब्रुवारी महिन्यापासूनच पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलंय की देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात यावी. खरंतर हा निर्णय याआधीच घ्यायला हवा होता. त्यासाठी मोदींनी चार महिने लावले. तेही राज्यांनी खूप दबाव टाकल्यानंतर केंद्रानं निर्णय घेतला", असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. 

कोरोना महामारीच्या उगमावेळीच प्रत्येक नागरिकाला त्याचं स्वास्थ्य उत्तम राहावं हा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा असणारा मोफत लसीकरणाचा निर्णय याआधीच घ्यायला हवा होता. मोदींनी निर्णय घ्यायला खूप उशीर केला. आतातरी मोदी प्रचाराऐवजी लसीकरणावर अधिक लक्ष देतील अशी आशा आहे, अशी जोरदार टीका ममतांनी केली आहे.

केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्रात नापास ठरलं आहे. त्यामुळे मोफत लसीकरणाचं क्रेडिट पंतप्रधानांनी तर घेऊच नये. सुप्रीम कोर्टानं लसीकरणाबाबत केंद्राला झापल्यानंतर मोदींनी निर्णय घेतला. आम्हीसुद्धा कोर्टात याचिका दाखल केली होती, असं ममता म्हणाल्या. बिहार निवडणुकीआधी देखील भाजपनं मोफत कोरोना लसीकरणाचं गाजर दाखवलं होतं, त्याचं काय झालं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

कोरोनावरील उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय उपकरणांवर केंद्र सरकार अजूनही जीएसटी घेत आहे. कोरोनापासून ते शेतकरी कायद्यापर्यंत संपूर्ण देश केंद्राच्या छळाला सामोरं जात आहे. कोरोनासाठीची केंद्र सरकारची नेमकी पॉलिसी तरी काय आहे? याचीही कुणाला कल्पना नाही, असंही ममता यावेळी म्हणाल्या. 

पश्चिम बंगालमध्ये आम्ही आतापर्यंत २० लाख लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. पण केंद्राकडून मोदींच्या भाषणाशिवाय दुसरं काहीच आम्हाला मिळत नाही. त्यामुळे मोदींना हटवा हीच आमची मागणी आहे, असा घणाघात ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस