शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

पैसा जनतेचा मग मोफत कोरोना लसीचं क्रेडिट मोदी का घेतायत?, ममता बॅनर्जींचा रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:46 IST

Mamata Banerjee: देशातील १८ वर्षांवरील सर्वांना २१ जूनपासून कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानंतर या निर्णयाचं क्रेडिट पंतप्रधानांनी घेतल्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे.

देशातील १८ वर्षांवरील सर्वांना २१ जूनपासून कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केल्यानंतर या निर्णयाचं क्रेडिट पंतप्रधानांनी घेतल्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे. "कोरोना विरोधी लस मोफत दिल्याचं क्रेडिट पंतप्रधान मोदी का घेतायत? देशातील नागरिकांना मोफत लस मिळावी हा त्यांचा अधिकार आहे. कारण त्यासाठी लागणारा पैसा जनतेच्याच खिशातून आलेला आहे. भाजपनं खर्च केलेला नाही", असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. (Citizens money why is PM taking credit for free doses asks Mamata Banerjee)

"आम्ही तर फेब्रुवारी महिन्यापासूनच पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलंय की देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात यावी. खरंतर हा निर्णय याआधीच घ्यायला हवा होता. त्यासाठी मोदींनी चार महिने लावले. तेही राज्यांनी खूप दबाव टाकल्यानंतर केंद्रानं निर्णय घेतला", असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. 

कोरोना महामारीच्या उगमावेळीच प्रत्येक नागरिकाला त्याचं स्वास्थ्य उत्तम राहावं हा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा असणारा मोफत लसीकरणाचा निर्णय याआधीच घ्यायला हवा होता. मोदींनी निर्णय घ्यायला खूप उशीर केला. आतातरी मोदी प्रचाराऐवजी लसीकरणावर अधिक लक्ष देतील अशी आशा आहे, अशी जोरदार टीका ममतांनी केली आहे.

केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्रात नापास ठरलं आहे. त्यामुळे मोफत लसीकरणाचं क्रेडिट पंतप्रधानांनी तर घेऊच नये. सुप्रीम कोर्टानं लसीकरणाबाबत केंद्राला झापल्यानंतर मोदींनी निर्णय घेतला. आम्हीसुद्धा कोर्टात याचिका दाखल केली होती, असं ममता म्हणाल्या. बिहार निवडणुकीआधी देखील भाजपनं मोफत कोरोना लसीकरणाचं गाजर दाखवलं होतं, त्याचं काय झालं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

कोरोनावरील उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय उपकरणांवर केंद्र सरकार अजूनही जीएसटी घेत आहे. कोरोनापासून ते शेतकरी कायद्यापर्यंत संपूर्ण देश केंद्राच्या छळाला सामोरं जात आहे. कोरोनासाठीची केंद्र सरकारची नेमकी पॉलिसी तरी काय आहे? याचीही कुणाला कल्पना नाही, असंही ममता यावेळी म्हणाल्या. 

पश्चिम बंगालमध्ये आम्ही आतापर्यंत २० लाख लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे. पण केंद्राकडून मोदींच्या भाषणाशिवाय दुसरं काहीच आम्हाला मिळत नाही. त्यामुळे मोदींना हटवा हीच आमची मागणी आहे, असा घणाघात ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस