शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

"छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं, विरोध करण्याचं कारण नाही,’’ पक्षाचा विरोध असताना काँग्रेसच्या या मंत्र्याने मांडलं वेगळं मत

By बाळकृष्ण परब | Updated: January 7, 2021 17:37 IST

Vijay Vadettiwar : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराविरोधात पुन्हा एकदा स्पष्ट मत मांडलं असताना राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देछत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाहीमात्र सामाजिक सलोखा बिघडता कामा नयेऔरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे खडाखडी

मुंबई - औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये खडाखडी सुरू आहे. एकीकडे शिवसेनेने नामांतरावरून आग्रही भूमिका घेतली असताना काँग्रेसने मात्र सुरुवातीपासून नामांतराला विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराविरोधात पुन्हा एकदा स्पष्ट मत मांडलं असताना राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याबाबत आपली भूमिका मांडताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मात्र सामाजिक सलोखा बिघडता कामा नये, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत आज पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली होती. महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहोत, पण नामांतराला आमचा विरोध राहील, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलं. महाविकास आघाडीमध्ये किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहील. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची अवहेलना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहील, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलं होतं. शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारPoliticsराजकारण