शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘आता खैरे बस्स!’ पण..., युती होणार की नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 06:27 IST

औरंगाबाद लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या जागेबद्दल ‘राष्ट्रवादी आग्रही असून, सतीश चव्हाण उमेदवार राहतील’, असे जाहीर केल्यापासून चुरस वाढली आहे.

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या जागेबद्दल ‘राष्ट्रवादी आग्रही असून, सतीश चव्हाण उमेदवार राहतील’, असे जाहीर केल्यापासून चुरस वाढली आहे. काँग्रेसला ही जागा हातातून जाते की काय, अशी भीती आहे. ही जागा आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण व सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.औरंगाबाद हे सामाजिक व राजकीय चळवळीचे केंद्र आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची झालेली दोस्ती महाराष्ट्राने बघितली. आता ओवैसी व अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उठवलेले वादळ कुणावर धडकते, हे बघणे रंजक ठरेल. बीआरएसपीचे डॉ. सुरेश माने यांनीही औरंगाबादवर लक्ष केंद्र्रित केले आहे. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार दिला तर मतांची विभागणी अटळ आहे. काँग्रेस आघाडीत आंबेडकर सहभागी झाले तर मग काँग्रेसची दावेदारी बळकट होईल.खा. चंद्रकांत खैरे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता नाही. शिवसेना-भाजपाकडे वर्षानुवर्षे महापालिका असताना विकासाच्या बाबतीत युती अपयशीच ठरत आलेली आहे. खा. खैरे हे नेहमीच ‘हे मी केलं, ते मी केलं’ असे ऐकवत असतात; पण त्यावर लोकांचा विश्वास नाही. ऐनवेळी भावनिक प्रश्न निर्माण करून मतांची पोळी भाजून घेणे हे तंत्र यशस्वी झाल्याने खैरे यशस्वी झाले. यावेळी ‘आता खैरे बस्स’ असा सूर आहे. पक्षांतर्गत विरोधकांची संख्याही वाढली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खैरे यांच्यातील कलगीतुरा मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी अनुभवला. युती झाली तरी हा बेबनाव खैरेंना महागात पडू शकतो. पक्षांतर्गत विरोधकांना खैरे किती एकवटू देऊ शकतात, हे महत्त्वाचे. बागडेंची प्रतिमा मलिन करण्याचा खैरेंनी प्रयत्न केला, बेछूट आरोप केले, संयम बाळगला नाही, असा मतप्रवाह आहे.युतीवरून वरिष्ठ नेत्यांचीच ताणाताणी सुरू आहे; पण भाजपाही तयारीत आहेच. बागडे, जयसिंगराव गायकवाड, डॉ. भागवत कराड, एकनाथ जाधव, विजया रहाटकर, हीे उमेदवार म्हणून चर्चेत आहेतच.काँग्रेसने जिल्हा निवड मंडळाची दहा उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रा. रवींद्र बनसोड हा नवा चेहरा यादीत आहे. अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे, नामदेवराव पवार यांच्यासह १२ नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार आहेत. एमआयएम- वंचित बहुजन आघाडी उमेदवार जाहीर करील काय, डाव्यांकडून कॉ. भालचंद्र कांगो लढतील काय, याचीही उत्सुकता आहे. युती झाली तरी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येतील का? काँग्रेस- राष्टÑवादी आघाडीचा उमेदवार कोण, त्यालाही निवडून आणण्यासाठी प्रयत्न होतात काय आणि सरकारविरुद्धच्या असंतोषाचा खरा फायदा पदरात पाडून घेता येईल काय, यावरच लोकसभेच्या जागेचे भवितव्य अवलंबून आहे.>सध्याची परिस्थितीशिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा मतदारसंघात सातत्याने संपर्क आहे. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न खैरे यांच्याकडून सातत्याने होताना दिसत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा चंद्रकांत खैरे यांच्यावर राग आहे. शिवाय शिवसेनेतील मराठा कार्यकर्त्यांचाही खैरे यांना आतून विरोध आहेच. युती होते की नाही, याकडेही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. सध्या युतीमधील खैरे आणि विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसकडून बारा जण इच्छुक आहेत. सरकारविरुद्धचा असंतोष आणि दुष्काळी परिस्थिती यासंदर्भात काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत, असे चित्र नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९