शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

बालेकिल्ला राखण्याचे सेनेसमोर आव्हान, तिरंगी लढतीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 06:35 IST

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़

- अभिमन्यू कांबळेशिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़१९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून १९७७ चा अपवाद वगळता काँग्रेसचे वर्चस्व असलेला परभणी लोकसभा मतदारसंघ १९९१ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. परभणीनेच शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून दिली. १९९१ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे अशोकराव देशमुख २०,१६१ मतांनी निवडून आले. त्यानंतर १९९८ मधील निवडणुकीचा अपवाद वगळता सातत्याने शिवसेनेचे वर्चस्व आहे. आघाडीच्या जागा वाटपात २००४ मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला; परंतु, गेल्या तीन निवडणुकांमध्ये या पक्षाला विजय मिळविता आलेला नाही. २०१४ च्या निवडणुकीत देशभर नरेंद्र मोदी यांची लाट असताना राष्ट्रवादीचे उमेदवार आ. विजय भांबळे यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना तगडी टक्कर दिली होती. यावेळेसही भांबळे यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत; परंतु, भांबळे यांची निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. त्यांना जिंतूर विधानसभेत रस आहे. राष्ट्रवादीकडून माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर, माजी खा. सुरेश जाधव यांनीही उमेदवारी मागितली आहे; परंतु, या तिन्ही उमेदवारांपेक्षा भांबळे यांचेच नाव सध्या तरी आघाडीवर आहे. उमेदवारीच्या मतऐक्याबाबत दोनवेळा मुंबईत बैठक झाली; परंतु, एकमत झाले नाही. काँग्रेसनेही या मतदारसंघात चाचपणी केली आहे; परंतु, राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ सोडवून घेऊन तयारी करायची म्हटली तर काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांना पाथरी विधानसभेची निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी अनुत्सुकता दर्शविली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनीही निवडणुकीची तयारी चालविली आहे़ सहा महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात दोन वेळा दौरे केले. युती होण्यापूर्वी भाजपकडून बोर्डीकरांचेच नाव चर्चेत होते; आता त्या माघार घेणार की अन्य मार्ग अवलंबितात, याची उत्सुकता आहे़ बोर्डीकर या रिंगणात कायम राहिल्या तर तिरंगी लढत होईल आणि त्याचा परिणाम शिवसेनेचे उमेदवार खा़ जाधव यांच्या मतपेटीवर होवू शकतो़ विद्यमान खासदार जाधव हे पुन्हा शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांनी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जोरदार तयारी चालविली आहे; परंतु, सेनेतील अंतर्गत मतभेदही जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय झाला आहे. सेनेचे परभणीचे आ.राहुल पाटील आणि खा.जाधव यांच्यातील वाद मातोश्रीवर पोहोचला, तरीही मिटलेला नाही. शिवाय परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि खा. जाधव यांचेही मतभेद मिटलेले नाहीत, हीदेखील शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे. रावते यांना मानणारा परभणीत मतदार आहे. त्यामुळे या वादावर पुन्हा एकदा मातोश्रीवरून तोडगा निघाला तरच जाधव यांना सेनेचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्याचा मार्ग सुकर होईल़>सध्याची परिस्थिती२०१४ च्या निवडणुकीत खा.संजय ऊर्फ बंडू जाधव यांना पक्षा व्यतिरिक्त आ.विजय भांबळे यांच्या विरोधातील कॉंग्रेस- राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांनीही मदत केली होती. यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. खा. जाधव यांना मदत करणारे तत्कालीन सहकारी आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे एकमेकांना मदतीची भावना हे मित्रपक्ष कितपत बाळगतील याविषयी शंका उपस्थित होत आहे.मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरही शिवसेना- राष्ट्रवादीच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत़ परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी जिंतूर, गंगाखेड, घनसावंगी हे तीन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर पाथरी, परतूर हे दोन मतदारसंघ भाजपाकडे आहेत आणि परभणी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv Senaशिवसेना