शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बालेकिल्ला राखण्याचे सेनेसमोर आव्हान, तिरंगी लढतीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 06:35 IST

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़

- अभिमन्यू कांबळेशिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने व जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलल्याने शिवसेनेसमोर बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे़१९६२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून १९७७ चा अपवाद वगळता काँग्रेसचे वर्चस्व असलेला परभणी लोकसभा मतदारसंघ १९९१ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. परभणीनेच शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून दिली. १९९१ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे अशोकराव देशमुख २०,१६१ मतांनी निवडून आले. त्यानंतर १९९८ मधील निवडणुकीचा अपवाद वगळता सातत्याने शिवसेनेचे वर्चस्व आहे. आघाडीच्या जागा वाटपात २००४ मध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला; परंतु, गेल्या तीन निवडणुकांमध्ये या पक्षाला विजय मिळविता आलेला नाही. २०१४ च्या निवडणुकीत देशभर नरेंद्र मोदी यांची लाट असताना राष्ट्रवादीचे उमेदवार आ. विजय भांबळे यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना तगडी टक्कर दिली होती. यावेळेसही भांबळे यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहेत; परंतु, भांबळे यांची निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. त्यांना जिंतूर विधानसभेत रस आहे. राष्ट्रवादीकडून माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर, माजी खा. सुरेश जाधव यांनीही उमेदवारी मागितली आहे; परंतु, या तिन्ही उमेदवारांपेक्षा भांबळे यांचेच नाव सध्या तरी आघाडीवर आहे. उमेदवारीच्या मतऐक्याबाबत दोनवेळा मुंबईत बैठक झाली; परंतु, एकमत झाले नाही. काँग्रेसनेही या मतदारसंघात चाचपणी केली आहे; परंतु, राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ सोडवून घेऊन तयारी करायची म्हटली तर काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांना पाथरी विधानसभेची निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी अनुत्सुकता दर्शविली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनीही निवडणुकीची तयारी चालविली आहे़ सहा महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात दोन वेळा दौरे केले. युती होण्यापूर्वी भाजपकडून बोर्डीकरांचेच नाव चर्चेत होते; आता त्या माघार घेणार की अन्य मार्ग अवलंबितात, याची उत्सुकता आहे़ बोर्डीकर या रिंगणात कायम राहिल्या तर तिरंगी लढत होईल आणि त्याचा परिणाम शिवसेनेचे उमेदवार खा़ जाधव यांच्या मतपेटीवर होवू शकतो़ विद्यमान खासदार जाधव हे पुन्हा शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांनी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जोरदार तयारी चालविली आहे; परंतु, सेनेतील अंतर्गत मतभेदही जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेचा विषय झाला आहे. सेनेचे परभणीचे आ.राहुल पाटील आणि खा.जाधव यांच्यातील वाद मातोश्रीवर पोहोचला, तरीही मिटलेला नाही. शिवाय परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि खा. जाधव यांचेही मतभेद मिटलेले नाहीत, हीदेखील शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे. रावते यांना मानणारा परभणीत मतदार आहे. त्यामुळे या वादावर पुन्हा एकदा मातोश्रीवरून तोडगा निघाला तरच जाधव यांना सेनेचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्याचा मार्ग सुकर होईल़>सध्याची परिस्थिती२०१४ च्या निवडणुकीत खा.संजय ऊर्फ बंडू जाधव यांना पक्षा व्यतिरिक्त आ.विजय भांबळे यांच्या विरोधातील कॉंग्रेस- राष्ट्रवादीसह इतर पक्षातील नेत्यांनीही मदत केली होती. यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. खा. जाधव यांना मदत करणारे तत्कालीन सहकारी आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे एकमेकांना मदतीची भावना हे मित्रपक्ष कितपत बाळगतील याविषयी शंका उपस्थित होत आहे.मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरही शिवसेना- राष्ट्रवादीच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत़ परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी जिंतूर, गंगाखेड, घनसावंगी हे तीन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर पाथरी, परतूर हे दोन मतदारसंघ भाजपाकडे आहेत आणि परभणी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv Senaशिवसेना