शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी खासदारांचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा, पोलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात...
2
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
3
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
4
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
5
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
6
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
7
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
8
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
9
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
10
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
11
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
12
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
13
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
14
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
15
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
16
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
17
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
18
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
19
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
20
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...

"केंद्र सरकार चुकीची पावले उचलत आहे; अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:54 IST

P Chidambaram News: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी बैठकीत राज्यांनी विचारलेल्याप्रश्नांना उत्तरे न देता अचानक ती समाप्त झाल्याचे सांगितले.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चुकीची पावले उचलत असल्याचा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला. ते म्हणाले, या पावलांनी अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही. सरकारने गांभीर्याने असे उपाय शोधावेत ज्यामुळे लोकांच्या खिशांत पैसे येतील व ते स्वेच्छेने तो खर्च करू शकतील.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी बैठकीत राज्यांनी विचारलेल्याप्रश्नांना उत्तरे न देता अचानक ती समाप्त झाल्याचे सांगितले. चिदम्बरम यांनी सीतारामण यांच्या या वागण्यावर आश्चर्य व्यक्त करून आरोप केला की, ‘राज्यांची स्वत:ची भूमिका असून, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जायला हवी होती. जर सरकार ते टाळत आहे, तर राज्य सरकारे त्यांना उपलब्ध असलेल्या पर्यायांचा वापर करतील.’सरकारला विचारले प्रश्नचिदम्बरम म्हणाले, राज्यांनी १२ टक्के जीएसटीवाल्या उत्पादनाला आपल्या पैशाने खरेदी का करावे? ते स्वतंत्र आहेत. त्यांंना हवे तेथे ते त्यांचे पैसे खर्च करतील. कर सवलतीच्या नावाने सरकार कर्मचाऱ्यांना ज्या उत्पादनांची गरज नाही, ते विकत घेण्यासाठी भाग पाडत आहे. चिदम्बरम यांनी सरकारला सात प्रश्न विचारले. सरकार अशी बंधने कशी घालू शकते, ज्यात जीएसटीचे बिल असावे, ज्यावर १२ टक्के जीएसटी असावी, जीएसटी नोंदणीकृत दुकान असावे, डिजिटल पेमेंट व्हावे, असे चिदम्बरम म्हणाले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमEconomyअर्थव्यवस्था