शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"केंद्र सरकार चुकीची पावले उचलत आहे; अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:54 IST

P Chidambaram News: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी बैठकीत राज्यांनी विचारलेल्याप्रश्नांना उत्तरे न देता अचानक ती समाप्त झाल्याचे सांगितले.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चुकीची पावले उचलत असल्याचा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला. ते म्हणाले, या पावलांनी अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही. सरकारने गांभीर्याने असे उपाय शोधावेत ज्यामुळे लोकांच्या खिशांत पैसे येतील व ते स्वेच्छेने तो खर्च करू शकतील.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी बैठकीत राज्यांनी विचारलेल्याप्रश्नांना उत्तरे न देता अचानक ती समाप्त झाल्याचे सांगितले. चिदम्बरम यांनी सीतारामण यांच्या या वागण्यावर आश्चर्य व्यक्त करून आरोप केला की, ‘राज्यांची स्वत:ची भूमिका असून, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जायला हवी होती. जर सरकार ते टाळत आहे, तर राज्य सरकारे त्यांना उपलब्ध असलेल्या पर्यायांचा वापर करतील.’सरकारला विचारले प्रश्नचिदम्बरम म्हणाले, राज्यांनी १२ टक्के जीएसटीवाल्या उत्पादनाला आपल्या पैशाने खरेदी का करावे? ते स्वतंत्र आहेत. त्यांंना हवे तेथे ते त्यांचे पैसे खर्च करतील. कर सवलतीच्या नावाने सरकार कर्मचाऱ्यांना ज्या उत्पादनांची गरज नाही, ते विकत घेण्यासाठी भाग पाडत आहे. चिदम्बरम यांनी सरकारला सात प्रश्न विचारले. सरकार अशी बंधने कशी घालू शकते, ज्यात जीएसटीचे बिल असावे, ज्यावर १२ टक्के जीएसटी असावी, जीएसटी नोंदणीकृत दुकान असावे, डिजिटल पेमेंट व्हावे, असे चिदम्बरम म्हणाले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमEconomyअर्थव्यवस्था