शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

'जवानांच्या शौर्यावर संशय घेणाऱ्या वाचाळवीराला आता घरी बसवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 05:52 IST

जनतेने आपला रोष त्याला मतदानातून दाखवून द्यावा आणि त्याला घरी बसवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबई : देशातील जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले, ते सर्व जगाने पाहिले. मात्र, काँग्रेसच्या एका वाचाळवीराने जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तो वाचाळवीर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय. जनतेने आपला रोष त्याला मतदानातून दाखवून द्यावा आणि त्याला घरी बसवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी अंधेरी (पूर्व) सुभाषनगर येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. युती सरकारने गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचा गतिमान विकास होतो आहे. मुंबईत एक लाख कोटी रुपये खर्च करून २०० किमीचे मेट्रोचे जाळे उभे राहात आहे. रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकारने साठ हजार कोटी निधी दिला आहे. ५०० फूट घरांना मालमत्ता करात सूट, २०११ पर्यंतच्या पात्र झोपड्यांना ३०० फुटांचे मोफत घर, कोस्टल रोडची निर्मिती याचा मोठा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे.काँग्रेसचा अर्धा वेळ मोदींवर टीका करण्यातनिवडणुका जवळ आल्या की, काँग्रेस ‘गरिबी हटाव’चा नारा देते, पण सामान्य माणसांची गरिबी त्यांनी हटविली नाही. राहुल गांधी म्हणतात, ७२ हजार रुपये देणार. त्यांना विचारले कसे देणार? तर त्यांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. काँग्रेसची भाषणे आणि आश्वासने पोकळ आहेत. त्यांचा अर्धा वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात जातो, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारार्थ दहिसरमधील अशोकवन येथे मुख्यमंत्री बोलत होते.‘आमच्या काळात मुंबईकर सुरक्षित’२००८ साली आघाडी सरकारच्या काळात मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती. मात्र, आमच्या गेल्या साडेचार वर्षांच्या काळात मुंबईकर सुरक्षित राहून मुंबईत एकही बॉम्बस्फोट झाला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmumbai-north-west-pcमुंबई उत्तर पश्चिम