शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्यांचा थोडक्यात आढावा.

By admin | Updated: November 20, 2015 00:00 IST

ज्योती बसू भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे.तरुण गोगोई हे आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मे २००१ पासून तीन वेळा आसामचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. ते भारतीय राष्ट्रीय ...

ज्योती बसू भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांनी इसवी सन १९७७ ते २००० पर्यंत पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून भारतातील सर्वांत जास्त वेळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केला आहे.

तरुण गोगोई हे आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मे २००१ पासून तीन वेळा आसामचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.

शीला दीक्षित १९९८ सालापासून तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण १५ वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. परंतु २०१३ दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी दीक्षित ह्यांचा दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव केला.

पवनकुमार चामलिंग हे सिक्किम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष असलेले चामलिंग मुख्यमंत्रीपदावर १९९४ सालापासून आहेत.

ओक्राम इबोबी सिंग हे मणिपूर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २००२ सालापासून ते सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून आले आहेत.

नवीन पटनायक हे ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व माजी केंद्रीय खाणमंत्री आहेत. बिजु जनता दल पक्षाचे संस्थापक असलेले पटनायक एक लेखक देखील आहेत. २००० पासून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

माणिक सरकार हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राजकारणी आहेत. १९९८ सालापासुन त्रिपुराचे मुख्यमंत्री आहेत. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट बूरो सदस्य ही आहेत. २०१३ झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीनंतर ते सहाव्यांदा आमदार व चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.

नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मे २६ इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर ७ २००१ पासून मे २२ २०१४ पर्यंत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते

भाजपाचा दणदणीत पराभव करून बिहारमध्ये पुन्हा सत्तेवर आलेल्या महागठबंधनचे प्रमुख नेते नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे.