शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भाजपाची चिंता वाढणार; शिवसेना, अकाली दलापाठोपाठ अजून एक पक्ष एनडीएपासून दुरावणार?

By बाळकृष्ण परब | Updated: September 23, 2020 07:58 IST

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:ही निवडणूक लढवावी आणि जनतेमधून निवडून यावे, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलोकजनशक्ती पक्षाकडून १४३ जागांवर निडणूक लढण्याची तयारी सुरू लोकजनशक्ती पक्षाकडूनही चिराग पासवान यांना बिहार निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची पूर्ण तयारीबिहारमध्ये एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून अद्याप एकमत होऊ शकलेले नाही

पाटणा - बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये फूट पडण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात उघडपणे आघाडी उघडली असून, ते निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, लोकजनशक्ती पक्षाकडूनही चिराग पासवान यांना बिहार निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकजनशक्ती पक्षाकडून १४३ जागांवर निडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:ही निवडणूक लढवावी आणि जनतेमधून निवडून यावे, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये फूट पडणे निश्चित आहे. सध्या एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून अद्याप एकमत होऊ शकलेले नाही.

गेल्याच आठवड्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या बैठकीमध्ये लोकजनशक्ती पक्षाच्या खासदारांनी नितीश कुमार यांच्या कामांवर टीका केली होती. कोरोना, स्थलांतरीत मजूर आणि महापूर या मुद्द्यांवरून लोकजनशक्ती पक्षाच्या खासदारांनी जेडीयूवर टीका केली होती. तसेच बिहारमध्ये भाजपाने जास्त जागांवर निवडणूक लढवावी, अशी मागणीही या खासदारांनी केली होती.२०१५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकजनशक्ती पक्षाने ४२ जागांवर निवडणूक लढवली होती. चिराग पासवान यांच्याकडून यावेळीही तेवढ्याच जागांची मागणी करण्यात येत आहे. मात्र नितीश कुमार पासवान यांच्या पक्षाला एवढ्या जागा देण्यासाठी राजी नाहीत. तर भाजपाही बिहार विधानसभेमधील २४३ जागांपैकी १०० पेक्षा कमी जागांवर लढण्यास तयार नाही आहे. तसेच जेडीयूकडूनही ११० ते १२० जागांवर दावा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्या पक्षांना जागा कशा सोडायच्या हा प्रश्न आहे.बिहारी जनता नितीश कुमारांवर नाराज असल्याची चिराग यांनी केली होती टीकाबिहारमध्ये सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू असून, रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. नितीश कुमार यांच्या कारभारावर बिहारमधील जनता नाराज असून, त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, असा दावा करत लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार चिराग पासवान यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातील नितीश सरकार कशाप्रकारे काम करत आहे आणि राज्यातील कोरोना विषाणूच्या फैलावाची सत्य परिस्थिती काय आहे, याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली होती. तसेच राज्यातील जनता बिहार सरकारच्या कामकाजावर तितकीशी समाधानी नसून, त्याचा परिणाम बिहार विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येईल, अशी शक्यता चिराग पासवान यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड

टॅग्स :Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBiharबिहारElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण