शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

भाजपाची चिंता वाढणार; शिवसेना, अकाली दलापाठोपाठ अजून एक पक्ष एनडीएपासून दुरावणार?

By बाळकृष्ण परब | Updated: September 23, 2020 07:58 IST

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:ही निवडणूक लढवावी आणि जनतेमधून निवडून यावे, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलोकजनशक्ती पक्षाकडून १४३ जागांवर निडणूक लढण्याची तयारी सुरू लोकजनशक्ती पक्षाकडूनही चिराग पासवान यांना बिहार निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची पूर्ण तयारीबिहारमध्ये एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून अद्याप एकमत होऊ शकलेले नाही

पाटणा - बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये फूट पडण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात उघडपणे आघाडी उघडली असून, ते निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, लोकजनशक्ती पक्षाकडूनही चिराग पासवान यांना बिहार निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकजनशक्ती पक्षाकडून १४३ जागांवर निडणूक लढण्याची तयारी सुरू आहे. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:ही निवडणूक लढवावी आणि जनतेमधून निवडून यावे, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएमध्ये फूट पडणे निश्चित आहे. सध्या एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून अद्याप एकमत होऊ शकलेले नाही.

गेल्याच आठवड्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या बैठकीमध्ये लोकजनशक्ती पक्षाच्या खासदारांनी नितीश कुमार यांच्या कामांवर टीका केली होती. कोरोना, स्थलांतरीत मजूर आणि महापूर या मुद्द्यांवरून लोकजनशक्ती पक्षाच्या खासदारांनी जेडीयूवर टीका केली होती. तसेच बिहारमध्ये भाजपाने जास्त जागांवर निवडणूक लढवावी, अशी मागणीही या खासदारांनी केली होती.२०१५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकजनशक्ती पक्षाने ४२ जागांवर निवडणूक लढवली होती. चिराग पासवान यांच्याकडून यावेळीही तेवढ्याच जागांची मागणी करण्यात येत आहे. मात्र नितीश कुमार पासवान यांच्या पक्षाला एवढ्या जागा देण्यासाठी राजी नाहीत. तर भाजपाही बिहार विधानसभेमधील २४३ जागांपैकी १०० पेक्षा कमी जागांवर लढण्यास तयार नाही आहे. तसेच जेडीयूकडूनही ११० ते १२० जागांवर दावा करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत चिराग पासवान आणि जीतनराम मांझी यांच्या पक्षांना जागा कशा सोडायच्या हा प्रश्न आहे.बिहारी जनता नितीश कुमारांवर नाराज असल्याची चिराग यांनी केली होती टीकाबिहारमध्ये सत्ताधारी एनडीएमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू असून, रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. नितीश कुमार यांच्या कारभारावर बिहारमधील जनता नाराज असून, त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, असा दावा करत लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार चिराग पासवान यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातील नितीश सरकार कशाप्रकारे काम करत आहे आणि राज्यातील कोरोना विषाणूच्या फैलावाची सत्य परिस्थिती काय आहे, याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली होती. तसेच राज्यातील जनता बिहार सरकारच्या कामकाजावर तितकीशी समाधानी नसून, त्याचा परिणाम बिहार विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येईल, अशी शक्यता चिराग पासवान यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली होती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड

टॅग्स :Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीBiharबिहारElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण