शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:04 IST

मत विभाजनामुळे चुरस; आ. गोटे आणि वंचित बहुजन आघाडीमुळे रंगत

- राजेंद्र शर्माधुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्यात होणाऱ्या चुरशीच्या सरळ लढतीला आता भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारीमुळे रंगत आली आहे.भाजपतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर काँग्रेसतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवातच धुळे येथून केली. दोघांच्या प्रचारसभा या आचारसंहिता जाहीर होण्याआधीच झाल्या. या प्रचारसभांमुळे आता धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहे, पण खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये होत आहे. त्यात भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक नबी अहमद यांच्या उमेदवारीमुळे अधिक चुरस निर्माण झाली आहे. कारण आमदार गोटे यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नबी अहमद यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसला मिळणाºया मुस्लीम मतांची विभागणी होणार आहे. बसपातर्फे नंदुरबारचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय अपरांती हे उमेदवार आहेत. यांच्यामुळे दलित व अल्पसंख्याक समाजाच्या मतांची विभागणी होणार आहे. याशिवाय भाजप आणि काँग्रेसने मराठा उमेदवार दिल्याने मतदारसंघातील मराठा मतांचेही विभाजन निश्चितच होणार आहे. या सर्व कारणामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. शेवटच्या क्षणी कोण बाजी मारेल, हे आजच सांगणे कठीण आहे, परंतु निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे, हे मात्र निश्चित.२०१४ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालो. संरक्षण सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. पाच वर्षांत २५ हजार कोटींचा निधी आणला. सुलवाडे-जामफळ, कनोली उपसा योजनांकरिता अडीच हजार कोटींचा निधी आणला. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मार्गी लावला. कॉँग्रेस आघाडीने काहीच काम केले नाही.- डॉ. सुभाष भामरे, भाजपशेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य मतदार हे गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत. या मतदारसंघातील खासदार प्रचंड अकार्यक्षम असल्याने लोकांची निराशा झाली आहे. त्यामुळे सर्व जनता माझ्या सोबत खंबीरपणे उभी आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने मला विजयाबद्दल विश्वास आहे.- कुणाल पाटील, काँग्रेसकळीचे मुद्देदिल्ली - मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर (डीएमआयसी) या प्रकल्पाचे काम रखडल्याने मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाचा प्रश्न ऐरणीवर जामफळ - कनोली आणि तापी - प्रकाशा - बुराई या दोन प्रकल्पांसह अन्य रेंगाळलेल्या सिंचन प्रकल्पांचा प्रश्न, बेरोजगारी हे मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019dhule-pcधुळे