शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

धुळ्यात भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:04 IST

मत विभाजनामुळे चुरस; आ. गोटे आणि वंचित बहुजन आघाडीमुळे रंगत

- राजेंद्र शर्माधुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्यात होणाऱ्या चुरशीच्या सरळ लढतीला आता भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारीमुळे रंगत आली आहे.भाजपतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर काँग्रेसतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवातच धुळे येथून केली. दोघांच्या प्रचारसभा या आचारसंहिता जाहीर होण्याआधीच झाल्या. या प्रचारसभांमुळे आता धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहे, पण खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये होत आहे. त्यात भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक नबी अहमद यांच्या उमेदवारीमुळे अधिक चुरस निर्माण झाली आहे. कारण आमदार गोटे यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नबी अहमद यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसला मिळणाºया मुस्लीम मतांची विभागणी होणार आहे. बसपातर्फे नंदुरबारचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय अपरांती हे उमेदवार आहेत. यांच्यामुळे दलित व अल्पसंख्याक समाजाच्या मतांची विभागणी होणार आहे. याशिवाय भाजप आणि काँग्रेसने मराठा उमेदवार दिल्याने मतदारसंघातील मराठा मतांचेही विभाजन निश्चितच होणार आहे. या सर्व कारणामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. शेवटच्या क्षणी कोण बाजी मारेल, हे आजच सांगणे कठीण आहे, परंतु निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे, हे मात्र निश्चित.२०१४ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालो. संरक्षण सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. पाच वर्षांत २५ हजार कोटींचा निधी आणला. सुलवाडे-जामफळ, कनोली उपसा योजनांकरिता अडीच हजार कोटींचा निधी आणला. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मार्गी लावला. कॉँग्रेस आघाडीने काहीच काम केले नाही.- डॉ. सुभाष भामरे, भाजपशेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य मतदार हे गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत. या मतदारसंघातील खासदार प्रचंड अकार्यक्षम असल्याने लोकांची निराशा झाली आहे. त्यामुळे सर्व जनता माझ्या सोबत खंबीरपणे उभी आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने मला विजयाबद्दल विश्वास आहे.- कुणाल पाटील, काँग्रेसकळीचे मुद्देदिल्ली - मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर (डीएमआयसी) या प्रकल्पाचे काम रखडल्याने मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाचा प्रश्न ऐरणीवर जामफळ - कनोली आणि तापी - प्रकाशा - बुराई या दोन प्रकल्पांसह अन्य रेंगाळलेल्या सिंचन प्रकल्पांचा प्रश्न, बेरोजगारी हे मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019dhule-pcधुळे