शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:04 IST

मत विभाजनामुळे चुरस; आ. गोटे आणि वंचित बहुजन आघाडीमुळे रंगत

- राजेंद्र शर्माधुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्यात होणाऱ्या चुरशीच्या सरळ लढतीला आता भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या उमेदवारीमुळे रंगत आली आहे.भाजपतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तर काँग्रेसतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवातच धुळे येथून केली. दोघांच्या प्रचारसभा या आचारसंहिता जाहीर होण्याआधीच झाल्या. या प्रचारसभांमुळे आता धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहे, पण खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये होत आहे. त्यात भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक नबी अहमद यांच्या उमेदवारीमुळे अधिक चुरस निर्माण झाली आहे. कारण आमदार गोटे यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतर्फे मालेगावचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नबी अहमद यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसला मिळणाºया मुस्लीम मतांची विभागणी होणार आहे. बसपातर्फे नंदुरबारचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय अपरांती हे उमेदवार आहेत. यांच्यामुळे दलित व अल्पसंख्याक समाजाच्या मतांची विभागणी होणार आहे. याशिवाय भाजप आणि काँग्रेसने मराठा उमेदवार दिल्याने मतदारसंघातील मराठा मतांचेही विभाजन निश्चितच होणार आहे. या सर्व कारणामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मतदारसंघात आता प्रचार शिगेला पोहोचला आहे. शेवटच्या क्षणी कोण बाजी मारेल, हे आजच सांगणे कठीण आहे, परंतु निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे, हे मात्र निश्चित.२०१४ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालो. संरक्षण सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. पाच वर्षांत २५ हजार कोटींचा निधी आणला. सुलवाडे-जामफळ, कनोली उपसा योजनांकरिता अडीच हजार कोटींचा निधी आणला. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मार्गी लावला. कॉँग्रेस आघाडीने काहीच काम केले नाही.- डॉ. सुभाष भामरे, भाजपशेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य मतदार हे गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारच्या कारभाराला कंटाळले आहेत. या मतदारसंघातील खासदार प्रचंड अकार्यक्षम असल्याने लोकांची निराशा झाली आहे. त्यामुळे सर्व जनता माझ्या सोबत खंबीरपणे उभी आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्याने मला विजयाबद्दल विश्वास आहे.- कुणाल पाटील, काँग्रेसकळीचे मुद्देदिल्ली - मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर (डीएमआयसी) या प्रकल्पाचे काम रखडल्याने मतदारसंघाच्या औद्योगिक विकासाचा प्रश्न ऐरणीवर जामफळ - कनोली आणि तापी - प्रकाशा - बुराई या दोन प्रकल्पांसह अन्य रेंगाळलेल्या सिंचन प्रकल्पांचा प्रश्न, बेरोजगारी हे मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019dhule-pcधुळे