शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

रालोआने गुंडाळली ‘सुशांतला न्याय’ मोहीम, बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात राजपूतच्या मृत्यूचा साधा उल्लेखही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 06:54 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘जस्टीस फॉर एसएसआर’ ही मोहीम सुरू करण्यात आघाडीवर होते. त्यांनी सीबीआय चौकशीचा आदेश देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. आज नितीशकुमार हे राजपूतच्या मृत्यूबद्दल शब्दही उच्चारत नाहीत. (Bihar Assembly election)

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या गूढ मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारवर एक ना अनेक प्रकारचे आरोप करून वातावरण तापवल्यानंतर मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) नेत्यांंनी पूर्णपणे शांत धोरण अवलंबिले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘जस्टीस फॉर एसएसआर’ ही मोहीम सुरू करण्यात आघाडीवर होते. त्यांनी सीबीआय चौकशीचा आदेश देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. आज नितीशकुमार हे राजपूतच्या मृत्यूबद्दल शब्दही उच्चारत नाहीत. भाजपनेदेखील पाटणा, दिल्ली आणि मुंबईत महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारला दोन पावले मागे रेटण्यासाठी सुरात सूर मिसळला होता आणि ठाकरेंविरुद्ध एक ना अनेक आरोप केले होते.

सीबीआय, सक्तवसुली संचालनालय आणि एनसीबी या तीन केंद्र सरकारच्या यंत्रणा सुशांतची मैत्रीण आणि इतरांच्या मागे लावल्या होत्या. त्यात बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांनी ते प्रकरण राजकीय कारस्थान बनवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. नंतर पांडेय यांनी नोकरी सोडली व जनता दलाकडून (यु) तिकीट मागून ते राजकीय आखाड्यात उतरले.

गेल्या १४ जून रोजी राजपूतचा झालेला मृत्यू हा मुंबई पोलिसांंनी आत्महत्येचे साधे प्रकरण म्हणून विचारात घेतले होते. प्रचार मोहीम सुरू असताना राजपूत प्रकरणावर शब्दही उच्चारला नाही. समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले राजपूतचे कुटुंबीयही आता शांत झाले. राजपूतच्या बहिणी हेळसांड करणे आणि चुकीची औषधे दिल्याबद्दल पोलीस प्रकरणांना तोंड देत आहेत. सहारसा जिल्ह्यात भाजपचा उमेदवार असलेला सुशांतसिंहचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू याने तो राजकीय विषय बनवला नाही. सीबीआयने ‘तपास सुरू आहे’ याशिवाय काहीही न म्हटल्यानंतर प्रकरणच गार पडले.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंग