शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

रालोआने गुंडाळली ‘सुशांतला न्याय’ मोहीम, बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात राजपूतच्या मृत्यूचा साधा उल्लेखही नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 06:54 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘जस्टीस फॉर एसएसआर’ ही मोहीम सुरू करण्यात आघाडीवर होते. त्यांनी सीबीआय चौकशीचा आदेश देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. आज नितीशकुमार हे राजपूतच्या मृत्यूबद्दल शब्दही उच्चारत नाहीत. (Bihar Assembly election)

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या गूढ मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारवर एक ना अनेक प्रकारचे आरोप करून वातावरण तापवल्यानंतर मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) नेत्यांंनी पूर्णपणे शांत धोरण अवलंबिले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘जस्टीस फॉर एसएसआर’ ही मोहीम सुरू करण्यात आघाडीवर होते. त्यांनी सीबीआय चौकशीचा आदेश देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. आज नितीशकुमार हे राजपूतच्या मृत्यूबद्दल शब्दही उच्चारत नाहीत. भाजपनेदेखील पाटणा, दिल्ली आणि मुंबईत महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारला दोन पावले मागे रेटण्यासाठी सुरात सूर मिसळला होता आणि ठाकरेंविरुद्ध एक ना अनेक आरोप केले होते.

सीबीआय, सक्तवसुली संचालनालय आणि एनसीबी या तीन केंद्र सरकारच्या यंत्रणा सुशांतची मैत्रीण आणि इतरांच्या मागे लावल्या होत्या. त्यात बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांनी ते प्रकरण राजकीय कारस्थान बनवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. नंतर पांडेय यांनी नोकरी सोडली व जनता दलाकडून (यु) तिकीट मागून ते राजकीय आखाड्यात उतरले.

गेल्या १४ जून रोजी राजपूतचा झालेला मृत्यू हा मुंबई पोलिसांंनी आत्महत्येचे साधे प्रकरण म्हणून विचारात घेतले होते. प्रचार मोहीम सुरू असताना राजपूत प्रकरणावर शब्दही उच्चारला नाही. समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले राजपूतचे कुटुंबीयही आता शांत झाले. राजपूतच्या बहिणी हेळसांड करणे आणि चुकीची औषधे दिल्याबद्दल पोलीस प्रकरणांना तोंड देत आहेत. सहारसा जिल्ह्यात भाजपचा उमेदवार असलेला सुशांतसिंहचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू याने तो राजकीय विषय बनवला नाही. सीबीआयने ‘तपास सुरू आहे’ याशिवाय काहीही न म्हटल्यानंतर प्रकरणच गार पडले.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंग