शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

बिहारमध्ये NDA २२० जागा जिंकणार, भाजपाच्या मोठ्या नेत्याचे भाकित

By बाळकृष्ण परब | Updated: September 29, 2020 18:01 IST

पाटणा - एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि ...

ठळक मुद्दे बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास आम्ही गेल्या १५ वर्षांत जे काम केले आहे. त्या आधारावर मत मागत आहोतएनडीएमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही. बीजेपी, जेडीयू , एलजेपी आणि मांझी यांचा पक्ष एकत्र आहेत

पाटणा - एकीकडे कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असतानाच निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे बिहारमधील आणि देशातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सभा, प्रचार यावर अनेक निर्बंध घातले असले तरी सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चेबांधणी आणि दावे-प्रतिदावे जोरात सुरू आहेत. दरम्यान, बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए २२० जागा जिंकून दणदणीत विजय मिळवेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केला आहे. एनडीए बिहारमधील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे आणि या निवडणुकीत एनडीएला २२० जागा मिळतील, असे शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे.शाहनवाझ हुसेन म्हणाले की, बिहार विधानसभेसाठी आता निवडणुकीची घोषणा झालेली आहे. बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास आहे. कोरोनाकाळात राज्य आणि केंद्र सरकारने जे काम केले आहे ते लोकांना दिसत आहे. यावेळी हुसेन यांनी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलावरही जोरदार टीका केली. जे लोक रजिस्ट्रीशिवाय तिकीट देत नव्हते ते आज दहा लाख रोजगार देण्याच्या बाता मारत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले की आम्ही गेल्या १५ वर्षांत जे काम केले आहे. त्या आधारावर मत मागत आहोत. आम्ही पटणामध्ये एम्स बांधले. चार लाख शिक्षकांची नियुक्ती केली. नर्सिंग कॉलेज सुरू केले. आम्ही वाकासाच्या मुद्द्यावरूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमची आघाडी चांगली आहे. एनडीएमध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नाही. बीजेपी, जेडीयू , एलजेपी आणि मांझी यांचा पक्ष एकत्र आहेत. आमच्यात लवकरच जागावाटप होणार आहे.मात्र एकीकडे शाहनवाझ हुसेन हे एनडीएमध्ये सारे काही आलबेल असल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे एलजेपीचे राष्ट्रीय सरचिटणीस शाहनवाझ अहमद यांनी काही वेळापूर्वीच पक्षाकडून चिराग पासवास हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असा दावा केला आहे. तसेच एलजेपीने एनडीएसमोर ४२ जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र भाजपा-जेडीयूने त्यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BJPभाजपाBiharबिहारPoliticsराजकारण