शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

"बंगाल बनलाय अल कायदाचा अड्डा, येथील परिस्थिती काश्मीरपेक्षाही वाईट"

By बाळकृष्ण परब | Updated: November 15, 2020 16:00 IST

BJP News : भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आज राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर आरोप केला आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी कूचबिहारमध्ये अल कायदाच्या सदस्यांची ओळख पटवण्यात आली होती. त्यांचे नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये विस्तारले आहेहे राज्य दहशतवाद्यांचा अड्डा बनले आहे. येथील परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट बनलेली आहेतृणमूलच्या सदस्यांनी आपली पद्धच बदलावी, अन्यथा त्यांना हॉस्पिटल किंवा स्मशानात जावं लागेल

कोलकाता - भाजपाचेपश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आज राज्यातील परिस्थितीबाबत गंभीर आरोप केला आहे. राज्यातील कुचबिहार भागात कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या अनेक सदस्यांची ओळख पटवली गेली आहे, असा दावा दिलीप घोष यांनी केला आहे. बंगालमध्ये बसून हे दहशतवादी अल कायदाची मदत करत आहेत. ते देशातील शांतता बिघडवू पाहत आहेत. बंगालमध्ये या दहशतवाद्यांचे नेटवर्क विस्तारले आहे. त्याचा शोध घेणे गरजेचे आहे, असेही दिलीप घोष यांनी सांगितले.याबाबत दिलीप घोष म्हणाले की, काही दिवसांपूर्वी कूचबिहारमध्ये अल कायदाच्या सदस्यांची ओळख पटवण्यात आली होती. त्यांचे नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये विस्तारले आहे. हे राज्य दहशतवाद्यांचा अड्डा बनले आहे. येथील परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट बनलेली आहे.यापूर्वी रविवारी दिलीप घोष म्हणाले होते की, भाजपा पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आला तर राज्यात लोकशाही पुन्हा स्थापित होईल. त्यासोबतच त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही इशारा दिला होता. तृणमूलच्या सदस्यांनी आपली पद्धच बदलावी, अन्यथा त्यांना हॉस्पिटल किंवा स्मशानात जावं लागेल.दिलीप घोष पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक ही केंद्रीय सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना आतापर्यंत्र त्रास देणाऱ्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पुढच्या सहा महिन्यांत सुधरावे. अन्यथा त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची वेळ येईल. त्यांचे हातपाय तोडले जातील.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाtmcठाणे महापालिका