शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
3
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
4
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
5
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
6
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
7
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
8
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
9
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
10
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
11
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
12
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
13
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
14
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
15
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
16
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
17
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
18
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
19
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
20
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?

"पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनच अर्णब गोस्वामींना मिळाली बालाकोट हल्ल्याची माहिती,’’ राहुल गांधींचा गंभीर आरोप

By बाळकृष्ण परब | Updated: January 25, 2021 17:30 IST

Balakot Air strike News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातूनच अर्णब गोस्वामी यांना बालाकोट हल्ल्याची माहिती मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

ठळक मुद्देनरेंद्र मोदींच्या माध्यमातूनच बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णब गोस्वामींना मिळाली अशी माहिती देऊन आमच्या हवाई दलाच्या जवानांचे प्राण संकटात टाकले गेलेराहुल गांधींनी मोदींवर केला गंभीर आरोप

करूर (तामिळनाडू) - व्हॉट्सअ‍ॅप चॅट लिक झाल्याने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी चांगलेच अडचणीत आले आहेत. बालाकोट हल्ल्यासारखी माहिती त्यांना आधीच मिळाली असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातूनच अर्णब गोस्वामी यांना बालाकोट हल्ल्याची माहिती मिळाली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.तामिळनाडू दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही गंभीर आरोप केला ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ती व्यक्ती आहे ज्यांच्या माध्यमातून बालाकोट एअर स्ट्राइकच्या आधी या कारवाईची माहिती रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांना मिळाली आहे. मात्र राहुल गांधी यांनी या संदर्भात कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान कार्यालयाकडूनही या दाव्याबाबत काही उत्तर आलेले नाही.काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या राहुल गांधी यांनी आज करूर येथे रोड शो केला. तेव्हा तेम्हणाले की, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांसह केवळ पाच जणांनाच कुठल्याही सैनिकी कारवाईची माहिती असते. मात्र काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराला बालाकोट एअर स्ट्राइकबाबत आधीच माहिती मिळाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाकडून बॉम्बवर्षाव करण्याच्या तीन दिवस आधीच एका पत्रकाराला काय होणार हे सांगितले गेले. असे करून आमच्या हवाई दलाच्या जवानांचे प्राण संकटात टाकले गेले, असा आरोप राहुल गांधींनी केला.राहुल गांधी म्हणाले की, बालाकोट एअर स्ट्राइकबाबत केवळ पंतप्रधान, संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गृहमंत्री आणि हवाई दल प्रमुख यांना माहिती होती. या लोकांशिवाय अन्य कुणालाही एअर स्ट्राइकच्या आधी याची माहिती नव्हती. आता बालाकोट एअर स्ट्राइकच्या आधी ही माहिती एका पत्रकाराला कुणी दिली. माहिती असलेल्यांपैकीच कुणीतरी हवाईदलासोबत विश्वासघात केला असावा, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक