शहरं
Join us  
Trending Stories
1
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
2
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
3
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
4
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
5
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
6
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
7
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
8
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान
9
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
10
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
11
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
12
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
13
जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
14
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
15
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
16
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
17
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
18
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
19
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
20
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता

“…तोपर्यंत आम्ही तिरंगा उभारणार नाही”; मेहबुबा मुफ्तींच्या वादग्रस्त विधानावरुन संताप   

By प्रविण मरगळे | Updated: October 24, 2020 10:51 IST

Mehbooba Mufti Controversial Statement News: मेहबुबा यांच्या विधानावर संतप्त झालेल्या सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदल यांनी मेहबुबा यांच्याविरूद्ध राष्ट्रीय सन्मान कायद्यासह कलम १२१, १५१, १५३ए, २९५, २९८, ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या वादग्रस्त विधानाने लोकांना भडकवलं आहे. जोपर्यंत आमचा ध्वज परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही दुसरा ध्वज उभारणार नाही - मेहबुबा मुफ्तीआम्ही कलम ३७० पुन्हा आणणारच आणि असे होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राष्ट्रीय ध्वजाविरूद्ध केलेल्या वादग्रस्त विधानावरुन दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी दिल्ली पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी वादग्रस्त विधान करताना म्हणाल्या होत्या की, आम्हाला आमचा जम्मू-काश्मीर ध्वज परत मिळेपर्यंत तिरंगा ध्वज हाती धरणार नाही. मेहबुबा यांच्या विधानावर संतप्त झालेल्या सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदल यांनी मेहबुबा यांच्याविरूद्ध राष्ट्रीय सन्मान कायद्यासह कलम १२१, १५१, १५३ए, २९५, २९८, ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

विनीत जिंदल यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या वादग्रस्त विधानाने लोकांना निवडून आलेल्या सरकारविरूद्ध भडकावले आहे. तसेच देशाच्या राष्ट्र ध्वजाचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत आमचा ध्वज परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही दुसरा ध्वज उभारणार नाही असं वादग्रस्त विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे.

शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा देश, दोन ध्वजांचे राजकारण पुढे केले. सुरुवातीला मेहबुबा म्हणाल्या की, आम्ही कलम ३७० पुन्हा आणणारच आणि असे होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. यासोबतच मेहबुबा यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल अपमानास्पद भाष्य केले. जेव्हा आमचा जम्मू काश्मीरचा झेंडा परत येईल तेव्हाच आम्ही तो (तिरंगा) ध्वजही घेऊ. तो ध्वज आमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तो आमचा ध्वज आहे. या ध्वजासोबत आमचं नातं आहे असं मेहबुबा म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांनीही असंच वादग्रस्त विधान केले होते, काश्मिरी लोकांना मोदी सरकारवर विश्वास राहिला नाही अशी लोकांची मानसिकता आहे. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानमध्ये जाणे सोपे होते, परंतु त्यांनी गांधींजींचा भारत निवडला होता मोदींचा भारत नाही. आज चीन दुसर्‍या बाजूने पुढे सरकत आहे. जर आपण काश्मिरींशी चर्चा केली तर बरेच लोक चीनने भारतात यावं असं म्हणतायेत. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीIndiaभारतNational Flagराष्ट्रध्वज