शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मंत्रालयातील लिफ्टमनला अजित पवारांनी विचारलं, किती पगार मिळतो तुला? उत्तर ऐकून झाले अस्वस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 08:36 IST

अजितदादा शब्दांचे पक्के आहेत. कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही, ही स्वत:चीच खंत उशिरा का होईना पण ते दूर करतील अशी अपेक्षा आहे.

मुंबई - अजित पवार नवेनवे उपमुख्यमंत्री झाले तेव्हा मंत्रालयातील लिफ्टमधून वर जात होते. लिफ्टमनला त्यांनी विचारलं, काय! किती पगार मिळतो तुला? लिफ्टमन म्हणाला साहेब! आठ हजार मिळतात. कामगारांना १५ हजार रुपये किमान वेतन असलं पाहिजे असा कायदा असताना चक्क मंत्रालयातच लिफ्टमनला आठ हजार रुपये कसे मिळतात म्हणून अजितदादा अस्वस्थ झाले अन् माहिती घेण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. माहिती मिळाली की, मंत्रालयात लिफ्टमन, सफाई कामासाठी मनुष्यबळाचं कंत्राट दोन कंपन्यांना दिलेलं आहे. त्या कामगारांना किती पगार देतात, शासन कंपन्यांना प्रत्येक कामगारामागे किती पैसा देत असते, याची विसंगती पुढे शोधली गेलीच नाही. सही एका रकमेवर घेतली जाते आणि हातात कमी पैसे टिकवले जातात, असे काही कामगार दबक्या आवाजात सांगतात. पिळवणूक सुरू आहे. अजितदादा शब्दांचे पक्के आहेत. कामगारांना किमान वेतन दिलं जात नाही, ही स्वत:चीच खंत उशिरा का होईना पण ते दूर करतील अशी अपेक्षा आहे.

आपने हमारा नमक खाया है!मीठ खाणं किंवा खाल्ल्या मिठाला जागणं याला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. नेत्यांच्या घरी त्यांनी चहापान, तर कुठे भोजनाचा लाभ घेतला. मात्र दादा नाशिक सोडून जात नाही तोच पालिकेच्या प्रभाग समितीत भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली. गद्दारीचा संशय भाजप नेत्यावर घेण्यात आल्याने तोही आपला बचाव करू लागला. दादा, माझ्या घरी येऊन गेले, मी नमक हरामी कशी करेल? असा प्रश्न या नेत्याने केला, मात्र दुसऱ्या पदाधिकाऱ्याने चूक सुधारत अरे दादा, तुझ्या घरी येऊन गेले ना, मग तुझ्या मिठाचा काय संबंध? असा प्रश्न त्याला केला, त्यावर त्याने दादांनी माझ्या घरचे नमक खाल्ले आहे, त्यांना माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे, म्हणूनच ना, असे म्हणताच हंशा पिकला.

अमरावतीच्या खासदारांची टी-डिप्लोमसीअमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची टी-डिप्लोमसी लोकप्रिय होत चालल्याने त्या याचा परिणामकारक वापर सामान्यांमध्ये मिसळण्यासाठी करीत आहेत. त्याचा प्रत्यय शनिवारी त्यांच्या पूरस्थितीच्या पाहणी दौऱ्यातही आला. त्याचे झाले असे की, खासदार नवनीत राणा या शनिवारी भातकुली तालुक्यात पुराच्या पाण्याने उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी मार्गातील एक चहा टपरी गाठली आणि अगदी आपुलकीच्या सुरात तेथील लोकांशी संवाद साधला. प्रत्यक्ष खासदार आपल्याशी संवाद साधत असल्याची सुखद अनुभूती लोकांच्या चेहऱ्यावर झळकत होती. एरवी चहा न घेणाऱ्या खासदारांनी सोबतच्या मंडळींना चहासाठी आग्रह करताना स्वत:देखील त्याचा आस्वाद घेतला.

'कुजबुज' या सदरासाठी यदु जोशी, संजय पाठक, गणेश वासनिक यांनी लेखन केले आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnavneet kaur ranaनवनीत कौर राणा