शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आदित्य ठाकरेंनी ठाण्यातून लढावे; ही तर युवा सैनिकांची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:53 IST

युवासेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढवायचीच असेल, तर त्यांनी ती ठाणे लोकसभा मतदारसंघातून लढवावी, अशी मागणी युवा सैनिकांनी पक्षनेतृत्वाकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे : युवासेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणूक लढवायचीच असेल, तर त्यांनी ती ठाणे लोकसभा मतदारसंघातून लढवावी, अशी मागणी युवा सैनिकांनी पक्षनेतृत्वाकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पहिली सत्ता ठाण्याने मिळवून दिल्याने, ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल, तर तिने ठाण्याचा विचार करावा, असे युवा सैनिकांचे म्हणणे आहे.आदित्य हे लोकसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध होताच, ठाण्यातील युवा सैनिकांमध्ये चर्चेचा व औत्सुक्याचा विषय ठरला. सोशल मीडियावर युवा सैनिकांनी हे वृत्त शेअर केले. त्यातूनच आदित्य यांनी ठाण्यातून निवडणूक लढवावी, अशी मागणी पुढे आली. उत्तर-मध्य मतदारसंघातून आदित्य निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी वृत्तात दिली आहे, परंतु त्यापेक्षा ठाणे लोकसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे व ठाणेकरांचे सेनेवर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम असल्याने आदित्य यांनी येथून विजयश्री मिळवावी, असे युवा सैनिकांना वाटते.२०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सेनेचे राजन विचारे यांना ५ लाख ९५ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यानंतर, आता पुन्हा युती झाल्याने ठाण्यातून आदित्य रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होतील, असे सैनिकांचे म्हणणे आहे. विचारे यांच्या उमेदवारीला भाजपामधील नगरसेवकांचा विरोध असून, त्यांच्याऐवजी अन्य कोणताही उमेदवार शिवसेनेने दिला, तर आम्ही त्याच्यासाठी काम करू, अशी भूमिका भाजपाच्या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे आदित्य यांना पक्षाने उमेदवारी दिली, तर सर्व वाद तर संपुष्टात येतीलच, शिवाय युती या नात्याने भाजपाचे नेते मनापासून आदित्य यांच्या विजयाकरिता प्रयत्न करतील, असा विश्वास शिवसैनिकांना वाटतो.गांभीर्याने विचार करण्याची मागणीकोपरी पाचपाखाडी तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जात आहे, तसेच या ठिकाणी सेनेचे २८ नगरसेवक आहेत. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात भाजपाचे १७ आणि सेनेचे १२ नगरसेवक आहेत. ओवळा माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या विचारात घेता तब्बल ३५ नगरसेवकांचे पाठबळ आहे. याशिवाय भाजपाचेसुद्धा मीरा-भार्इंदरमध्ये ६१ नगरसेवकांचे पाठबळ ही आदित्य यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. त्यामुळेच त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाचा गांभीर्याने विचार करावा, अशी आग्रही मागणी केली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेनाthaneठाणे