शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

धम्मभूमीच्या विकासास गती मिळणार?

By admin | Updated: December 25, 2015 01:41 IST

२५ डिसेंबर १९५४ रोजी येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या

देहूरोड : २५ डिसेंबर १९५४ रोजी येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ऐतिहासिक घटनेला शुक्रवारी, दि. २५ रोजी ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथमच सर्वच लोकप्रतिनिधींनी बुद्धविहार विकासकामे करण्यासाठी संरक्षण विभागाकडून परवानगीबाबत सकारात्मक भूमिका घेत पाठपुरावा करण्यात येत असल्याने बुद्धविहाराच्या विकासाची प्रतीक्षा डॉ. बाबासाहेबांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऐतिहासिक बुद्धविहाराचा डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा विस्तार व विकास करण्यात शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सरकारमधील जबाबदार घटकांनी (राज्याचे मंत्री, खासदार, आमदार) धम्मभूमीत येऊन तसे वक्तव्य केल्याने बौद्ध बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, बुद्धविहार कृती समिती व बुद्धविहार ट्रस्ट यांच्यात गेल्या काही दिवसांत होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे समाजबांधवांत संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. येथील बुद्ध मंदिरात डॉ. आंबेडकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची विधिपूर्ण प्रतिष्ठापना २५ डिसेंबर १९५४ रोजी करण्यात आली. १२०० वर्षांनंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान देहूरोडला मिळाला असल्याचे डॉ. आंबेडकर यांनी या वेळी झालेल्या भाषणात नमूद केले होते. या वेळी शंकरराव खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना समारंभाला ४० हजारांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. स्थानिक कार्यकर्ते दिवंगत लक्ष्मण रोकडे, हरीश चौरे उपस्थित होते. या वेळी डॉ. आंबेडकर यांनी हे जे देऊळ बांधण्यात आले आहे, ते अत्यंत आहे. ते जर आपण आहे, त्या स्थितीत ठेवाल, तर आपल्याला काळिमा लागेल. या देवळाला एक हॉल पाहिजे. प्रदक्षिणा करण्यासाठी जागा हवी आहे. तुम्ही सर्वांनी वर्गणी गोळा करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा. मात्र, भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका, असा सल्ला दिला होता. आजचा प्रसंग इतिहासात नोंदला जाईल. १२०० वर्षांनंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला आहे. याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे, म्हणून धन्यता मानली पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी स्वत: बुद्ध मूर्तीची स्थापना केली असल्याने दर वर्षी राज्यातून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला लाखो बौद्धबांधव येत असतात. वर्षभर भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, या स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या निधीच्या घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही प्रयत्न केले नव्हते. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत वास्तू निर्माण करण्याचे प्रयत्न दिसत नव्हता. बुद्धविहार व धम्मभूमीचा जीर्णोद्धार व्हावा, धम्मपीठ व्हावे, देशोदेशीच्या बौद्ध उपासकांनी भेट द्यावी आणि धम्मभूमीचे नाव सर्वदूर अजरामर व्हावे असे रोकडे, चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत होते. (वार्ताहर)