शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

धम्मभूमीच्या विकासास गती मिळणार?

By admin | Updated: December 25, 2015 01:41 IST

२५ डिसेंबर १९५४ रोजी येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या

देहूरोड : २५ डिसेंबर १९५४ रोजी येथील बुद्ध मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते त्यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ऐतिहासिक घटनेला शुक्रवारी, दि. २५ रोजी ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथमच सर्वच लोकप्रतिनिधींनी बुद्धविहार विकासकामे करण्यासाठी संरक्षण विभागाकडून परवानगीबाबत सकारात्मक भूमिका घेत पाठपुरावा करण्यात येत असल्याने बुद्धविहाराच्या विकासाची प्रतीक्षा डॉ. बाबासाहेबांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्त संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऐतिहासिक बुद्धविहाराचा डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा विस्तार व विकास करण्यात शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सरकारमधील जबाबदार घटकांनी (राज्याचे मंत्री, खासदार, आमदार) धम्मभूमीत येऊन तसे वक्तव्य केल्याने बौद्ध बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, बुद्धविहार कृती समिती व बुद्धविहार ट्रस्ट यांच्यात गेल्या काही दिवसांत होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे समाजबांधवांत संभ्रम निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. येथील बुद्ध मंदिरात डॉ. आंबेडकर यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची विधिपूर्ण प्रतिष्ठापना २५ डिसेंबर १९५४ रोजी करण्यात आली. १२०० वर्षांनंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान देहूरोडला मिळाला असल्याचे डॉ. आंबेडकर यांनी या वेळी झालेल्या भाषणात नमूद केले होते. या वेळी शंकरराव खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना समारंभाला ४० हजारांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. स्थानिक कार्यकर्ते दिवंगत लक्ष्मण रोकडे, हरीश चौरे उपस्थित होते. या वेळी डॉ. आंबेडकर यांनी हे जे देऊळ बांधण्यात आले आहे, ते अत्यंत आहे. ते जर आपण आहे, त्या स्थितीत ठेवाल, तर आपल्याला काळिमा लागेल. या देवळाला एक हॉल पाहिजे. प्रदक्षिणा करण्यासाठी जागा हवी आहे. तुम्ही सर्वांनी वर्गणी गोळा करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा. मात्र, भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका, असा सल्ला दिला होता. आजचा प्रसंग इतिहासात नोंदला जाईल. १२०० वर्षांनंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला आहे. याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे, म्हणून धन्यता मानली पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी स्वत: बुद्ध मूर्तीची स्थापना केली असल्याने दर वर्षी राज्यातून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला लाखो बौद्धबांधव येत असतात. वर्षभर भेट देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, या स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या निधीच्या घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही प्रयत्न केले नव्हते. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत वास्तू निर्माण करण्याचे प्रयत्न दिसत नव्हता. बुद्धविहार व धम्मभूमीचा जीर्णोद्धार व्हावा, धम्मपीठ व्हावे, देशोदेशीच्या बौद्ध उपासकांनी भेट द्यावी आणि धम्मभूमीचे नाव सर्वदूर अजरामर व्हावे असे रोकडे, चौरे व त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत होते. (वार्ताहर)