शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'आरक्षण घेऊनच येणार...', महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने

By प्रकाश गायकर | Updated: January 24, 2024 16:51 IST

राज्यातील धाराशीव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत...

पिंपरी : आम्ही वाहनांमधून महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य आणि साहित्य घेऊन निघालो आहे. त्यामध्ये स्वयंपाकासह कपडे, चादरी यांचा समावेश आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घेऊनच वापस येणार असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी केला.

राज्यातील धाराशीव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. एक महिना पुरेल इतक्या अन्नधान्यासोबत आवश्यक वस्तूंचा साठा घेऊन ते मुंबईकडे निघाले आहेत.

त्यामधील अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आरक्षण नसल्याने मुलांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आता आरक्षण घेऊनच मागे येणार असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. त्यासाठी शेतातील कामे उरकून ते निघाले आहेत. तसेच जी काही थोडी कामे शिल्लक आहेत ती करण्याची जबाबदारी घरातील महिला मंडळींवर सोपवण्यात आली आहेत. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईमध्येच राहणार आहेत. तसेच एक महिन्याचे रेशन संपल्यानंतर गावाकडून त्यांना शिधा पुरवण्यात येणार आहे. त्याबाबतची पूर्वकल्पना गावकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे कितीही दिवस लागले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. 

याबाबत बोलताना विष्णू जा‌धव म्हणाले, “ आम्ही शेतकरी आहे. आमच्याकडे अवघी एक-दोन एकर जमिन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठे आरक्षणापासून वंचित आहेत. मात्र, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे आता माघार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. 

मनोज जरांगे पाटील यांच्या रुपाने मराठा समाजाला एक प्रामाणिक नेता मिळाला आहे. या नेत्याचे एक वैशिष्ट्य आहे की हा नेता मॅनेज होत नाही. त्यामुळे या नेत्याच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आरक्षण मिळणार याची खात्री आहे. त्यामुळे या नेत्याच्या समर्थनार्थ आम्ही सगळे मुंबईला निघालो आहे. - विश्वंभर पठाडे, मराठा आंदोलक. 

 

माझी दोन मुल घरी आहेत. त्यांनी चांगले शिक्षण घेतले आहे. मात्र, चांगल्या मार्कांनी पास होऊनही त्यांना नोकरी लागली नाही. मला फक्त दोन एकर शेती आहे. ती पण कोरडवाहू आहे. त्यामुळे पुढे दोन मुलांच या शेतीत कसे भागणार हा प्रश्न आहे. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार. - बाबासाहेब मेंगडे, मराठा आंदोलक 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड