शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

'आरक्षण घेऊनच येणार...', महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने

By प्रकाश गायकर | Updated: January 24, 2024 16:51 IST

राज्यातील धाराशीव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत...

पिंपरी : आम्ही वाहनांमधून महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य आणि साहित्य घेऊन निघालो आहे. त्यामध्ये स्वयंपाकासह कपडे, चादरी यांचा समावेश आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घेऊनच वापस येणार असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी केला.

राज्यातील धाराशीव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. एक महिना पुरेल इतक्या अन्नधान्यासोबत आवश्यक वस्तूंचा साठा घेऊन ते मुंबईकडे निघाले आहेत.

त्यामधील अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आरक्षण नसल्याने मुलांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आता आरक्षण घेऊनच मागे येणार असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. त्यासाठी शेतातील कामे उरकून ते निघाले आहेत. तसेच जी काही थोडी कामे शिल्लक आहेत ती करण्याची जबाबदारी घरातील महिला मंडळींवर सोपवण्यात आली आहेत. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईमध्येच राहणार आहेत. तसेच एक महिन्याचे रेशन संपल्यानंतर गावाकडून त्यांना शिधा पुरवण्यात येणार आहे. त्याबाबतची पूर्वकल्पना गावकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे कितीही दिवस लागले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. 

याबाबत बोलताना विष्णू जा‌धव म्हणाले, “ आम्ही शेतकरी आहे. आमच्याकडे अवघी एक-दोन एकर जमिन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठे आरक्षणापासून वंचित आहेत. मात्र, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे आता माघार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. 

मनोज जरांगे पाटील यांच्या रुपाने मराठा समाजाला एक प्रामाणिक नेता मिळाला आहे. या नेत्याचे एक वैशिष्ट्य आहे की हा नेता मॅनेज होत नाही. त्यामुळे या नेत्याच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आरक्षण मिळणार याची खात्री आहे. त्यामुळे या नेत्याच्या समर्थनार्थ आम्ही सगळे मुंबईला निघालो आहे. - विश्वंभर पठाडे, मराठा आंदोलक. 

 

माझी दोन मुल घरी आहेत. त्यांनी चांगले शिक्षण घेतले आहे. मात्र, चांगल्या मार्कांनी पास होऊनही त्यांना नोकरी लागली नाही. मला फक्त दोन एकर शेती आहे. ती पण कोरडवाहू आहे. त्यामुळे पुढे दोन मुलांच या शेतीत कसे भागणार हा प्रश्न आहे. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार. - बाबासाहेब मेंगडे, मराठा आंदोलक 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड