शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ ला देशाचा पंतप्रधान कोण? कार्यकर्त्यांत शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 02:06 IST

२०१९ ला कोणाला देशाचा पंतप्रधान करायचे आहे, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला.

पिंपरी : निगडीत होणारी भाजपाची सभा मोठी झाली पाहिजे, लोकांना कळले पाहिजे की शिरूर आणि मावळ मतदारसंघात भाजपाने बैठक का घेतली, २०१९ ला कोणाला देशाचा पंतप्रधान करायचे आहे, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उपस्थितांमध्ये शांतता पसरली होती. ‘कोणाचाच आवाज निघत नाही... अशी भाजपा नव्हती पाहिली’ अशी नाराजी दानवे यांनी व्यक्त केली.मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतला. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हवेत राहू नका, हवेवर जाऊ नका, असा कानमंत्रही दिला. तीन नोव्हेंबरला प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर होणाऱ्या सभेला गर्दी जमविण्याचे आवाहन केले.‘‘भाजपाची सभा मोठी झाली पाहिजे. लोकांना कळले पाहिजे, की शिरूर आणि मावळ मतदारसंघात भाजपाने बैठक का घेतली. २०१९ ला कोणाला देशाचा पंतप्रधान करायचे आहे, असा प्रश्न दानवे यांनी कार्यकर्त्यांना विचारला. मात्र कोणाचाही आवाज निघाला नाही. त्यावर दानवे म्हणाले, ‘‘कोणाचाच आवाज निघत नाही? अशी भाजपा पाहिली नव्हती.’’ अशी उपरोधिक टिप्पणी केल्याने कोणाला पंतप्रधान करायचे असे पुन्हा विचारल्यावर ‘मोदी’ असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले.योग्य माणसाला मंत्रिपदमंत्रिमंडळ विस्तारात पिंपरी-चिंचवड शहराला संधी मिळेल का, असे विचारले असता दानवे म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. योग्य माणसाला संधी दिली जाईल. त्याची प्रक्रिया सुरू आहे. नावेही दिली आहेत. त्यावर निर्णय होईल.’’चिंचवडमधून केवळदहा हजार कार्यकर्ते?भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणिक संघटनेचा आढावा घेतला. बूथची माहिती घेतली. सभेला किती कार्यकर्ते येणार आहेत, सीएम चषकचाही आढावा घेतला. चिंचवडमधून दहा हजार कार्यकर्ते येतील, असे या वेळी सांगितले. त्यावर संघटनमंत्री विजय पुराणिक म्हणाले, ‘‘चिंचवड मतदारसंघावर सर्वांचे लक्ष आहे. ऐवढ्या मोठ्या मतदारसंघातून केवळ दहा हजारच कार्यकर्ते सभेला येणार?’’ त्यानंतर ‘पंधरा हजार येतील,’ असे कार्यकर्त्यांनी सांगितले.>भाजपामध्ये आयारामांचा भरणा झाला आहे. राजकीय वारे बदलेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील बडे नेते भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांप्रमाणे आयाराम कार्यकर्त्यांना भाजपाची संस्कृती समजली नसल्याचे यातून समोर येते.’’- रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवे