शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

वाहतूककोंडीची शाळा सुटणार कधी?

By admin | Updated: November 18, 2016 04:53 IST

शाळेत वेळेत पोहचण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्नशील असतो. पण, शाळेत पोहचण्यास रस्त्यावरील रहदारी, रोजची वाहतूककोंडी यात

तळवडे : शाळेत वेळेत पोहचण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्नशील असतो. पण, शाळेत पोहचण्यास रस्त्यावरील रहदारी, रोजची वाहतूककोंडी यात विद्यार्थी अडकून पडतात. बहुतांशी विद्यार्थी वेळेत पोहचता यावे यासाठी घरून लवकर निघत असतात. शाळा सुटल्यावरही वाहतूककोंडीत अडकून पडल्याने विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मनस्ताप वाढत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे.त्रिवेणीनगर, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, रुपीनगर, सहयोगनगर आदी भागातील विद्यार्थी यमुनानगर येथील शिवभूमी विद्यालय, तसेच मॉडर्न विद्यालयात शिक्षण घेत आहेत. या परिसरातील विद्यार्थ्यांना त्रिवेणीनगर चौकातून प्रवास करावा लागतो. या चौकातील सिग्नल कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. या ठिकाणी निगडी ते तळवडे मार्गावर छोटी-मोठी प्रवासी वाहने, मालवाहतूक करणाऱ्या मोटारी तसेच कंटेनर्स यांची सकाळ, संध्याकाळच्या वेळेत मोठी वर्दळ असते. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत चौक पार करताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांनाही सदर रस्ता ओलांडून जाणे जिवावरचे संकट असल्यासारखे वाटते. विद्यार्थ्यांना ओलांडून जाणे सोयीचे व्हावे, यासाठी वाहनचालक थांबण्याचे सौजन्य दाखवत नाहीत. पर्यायाने विद्यार्थी वाहनांच्या रांगेत घुसून रस्ता ओलांडतात. तळवडे येथील राजा शिवछत्रपती विद्यालयात तळवडे गावठाण, देहूगाव, विठ्ठलवाडी, शेलारवस्ती आदी भागांतून विद्यार्थी येत असतात. देहू, आळंदी रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. (वार्ताहर)