शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

स्मशानभूमीचा प्रश्न सुटणार कधी

By admin | Updated: July 8, 2017 02:24 IST

माण येथील गवारेवाडी येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अंत्यविधी रस्त्यावरच करावा लागत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंजवडी : माण येथील गवारेवाडी येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अंत्यविधी रस्त्यावरच करावा लागत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवण्यात येत असूनही हा विषय निकाली निघत नाही. यामुळे विकासाच्या दिशेने चाललेल्या माण गावातही समस्या कायम आहेत. परंतु टोलेजंग इमारतींच्या विळख्यात असलेल्या गवारेवाडीसाठी स्मशानभूमी नसणे ही निश्चितच समाधानकारक बाब नाही.वरील भयानक परिस्थितीमुळे मोठ्या आयटी कंपनीशेजारी, तसेच अग्निशामक दलाच्या समोरच अंत्यविधी करावा लागत असल्याने नागरिक हैराण आहेत. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत असून, अनेकदा पावसातच अंत्यविधी करावे लागतात. या परिसरात मोठी टाऊनशिप आहे. शेकडो कुटुंबे आता येथे वास्तव्यास आहेत. यातील अनेक जण राज्याबाहेरून आलेले आहेत. परिसरातील अधिक माहिती नसल्याने त्यांना हा प्रकार नवीन आहे. मात्र, भविष्यात त्यांनादेखील या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.गगनचुंबी इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी तरी बिल्डरने अशा प्रकल्पास सहकार्याची भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सोयीचा एकही निर्णय विकासक घेत नाहीत. तसेच एमआयडीसीची भूमिकादेखील संशयास्पद असून, सदर स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करण्यात आली आहे. परंतु ही जागा अद्यापही हस्तांतरित करण्यात आली नाही. त्यामुळे सदर स्मशानभूमीचे काम मंजूर असूनही त्यास मुहूर्त मिळत  नाही. विकासाच्या मृगजळातच सर्वसामान्य नागरिकांना डावलणे हितकारक नसून, प्रकल्पग्रस्तांच्या किमान सोयीसुविधा पुरवण्यासही प्रशासन कार्यक्षम नसावे, ही शरमेची बाब आहे. कारण माण येथील पुनर्वसनाला अनेक वर्षे उलटली आहेत. अद्यापही स्थानिकांना मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत आहेत. त्यावर लवकरात लवकर मार्ग निघणे आवश्यक आहे. अमरधाम स्मशानभूमी : एकच विद्युतदाहिनी तळवडे : निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथे पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने अंत्यविधी करण्याची सुविधा महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे. परंतु येथील स्मशानभूमीत एकच विद्युत दाहिनी असल्याने एकापेक्षा जास्त अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह आल्यावर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.महापालिका प्रशासनाने गॅसदाहिनी प्रकरणाची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांना मात्र आधुनिक पद्धतीने अंत्यविधी करण्याची इच्छा असतानाही, पारंपरिक पद्धतीचा वापर करावा लागत आहे.सध्याच्या काळात नागरिक पारंपरिक पद्धतीने म्हणजेच लाकडाचे सरण रचून त्यावर अंत्यविधी करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने विद्युतदाहिनीत अंत्यविधी करण्यास प्राधान्य देत आहेत. पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करताना होणारे प्रदूषण, त्यासाठी लागणारी लाकडे, त्यासाठी होणारी वृक्षतोड आदी सर्व बाबींचा विचार करून शहरी भागातील नागरिकांचा अंत्यविधीसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या विद्युतदाहिनीचा वापर करण्याकडे कल वाढत आहे.निगडीतील अमरधाम स्मशानभूमी येथे केवळ एकच विद्युतदाहिनी आहे़ वेळप्रसंगी एकापेक्षा जास्त मृतदेह अंत्यविधी आल्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे़ एक मृतदेहाचे अंत्यविधी होईपर्यंत नातेवाइकांना ताटकळत थांबावे लागत आहे. जास्त वेळ थांबणे शक्य नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे.गवारेवाडी स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून, एमआयडीसी, ग्रामपंचायत व पोलीस एकत्र आल्यास हा प्रश्न लवकर सुटेल. येथील स्मशानभूमी मंजूर असून, त्याचे काम सुरु करण्याच्या दृष्टीने लवकरच पावले उचलली जातील - संदीप साठे, उपसरपंच, माण ग्रामपंचायतनिगडी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत एक विद्युतदाहिनी कार्यरत आहे. दुसरी विद्युतदाहिनी सुरू करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु बसविण्यात आली नाही. आधुनिक पद्धतीने अंत्यविधी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. परंतु महापालिकेची गॅसदाहिनी खरेदीप्रकरणी प्रशासकीय कारवाई सुरू आहे. परंतु यामुळे निगडीतील अमरधाम स्मशानभूमी येथे नागरिकांना आधुनिक पद्धतीने अंत्यविधी करण्यासाठी एक विद्युतदाहिनी पुरशी नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याकडे प्राशासनाने लक्ष द्यावे.’’ -पंकज भालेकर, नगरसेवक