शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गुन्हेगारांना पकडणार कधी?

By admin | Updated: April 26, 2017 03:47 IST

मावळ तालुक्यात खून, लुटमार, जबरी चोरी व दरोड्याचे सत्र सुरू असून, सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे.

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात खून, लुटमार, जबरी चोरी व दरोड्याचे सत्र सुरू असून, सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. तालुक्यातील गुन्हेगारीचा हा वाढता आलेख रोखणे पोलीस खात्यापुढे मोठे आव्हान आहे. चोरटे आणि दरोडेखोरांच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळणे गरजेचे आहे. धामणे येथील फाले कुटुंबीयांवर मंगळवारी ओढवलेला दरोड्याचा प्रकार म्हणजे तळेगाव पोलिसांची अकार्यक्षमता वेशीला टांगल्यागतच जमा आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये दारुंब्रे येथील वाघोले वस्तीजवळ जडी-बुटीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या तंबूत घुसून सहा दरोडेखोरांनी चाकुुचा धाक दाखवून, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत सव्वालाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले. मंगळवारी ७ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास दरोड्याचा हा प्रकार घडला. लुटमारीसाठी दरोडेखोरांनी युको गाडीचा वापर केला. या संदर्भात रुमाबाई चितोडिया यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही पोलिसांना या दरोड्याचा तपास लावता आला नाही. पोलिसांचा चोरट्यांवर वचक राहिलेला दिसत नाही. मंगळवारी पहाटे धामणे येथे सशस्त्र दरोड्यात फाले परिवारातील तीन निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. योगायोग म्हणजे दारुंब्रे व धामणे येथे पडलेले दरोडे मंगळवारी पहाटे पडलेले आहेत. दरोडेखोरांना पायबंद घालणे पोलिसांपुढील मोठी डोकेदुखी ठरत आहे. तालुक्यातील वाढत्या चोऱ्या, हत्या, खून व दरोडे हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. तालुक्यातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य माणूस धास्तावला गेला आहे. माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची पूर्ववैमनस्यातून भर दिवसा झालेली निर्घृण हत्या तालुका विसरलेला नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये चेतन दत्तात्रय पिंजण (वय १७) या इंद्रायणी महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्याच दोन मित्रांनी किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून महाविद्यालय परिसरात भरदिवसा खून केला. तालुक्यातील गुन्हेगारी व हिंसक प्रवृत्तीत दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंतनीय बाब बनली आहे. तालुक्यात गुन्हेगारीचे जाळेच पसरले आहे. लुटमार, खून, हत्या यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तालुक्यातील वातावरण दूषित झाले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. सध्या मावळला निकोप वातावरणाची गरज आहे. युवा पिढी बिघडू लागल्याने समाजाची मोठी हानी होणार आहे. मावळात जमीन व्यवहारातून आर्थिक सुबत्ता आलेली आहे. एकत्र कुटुंबपद्धती इतिहास जमा होऊ लागली आहे. जमिनीचे तुकडीकरण वाढले. जमीन तुकड्याला सोन्याचा भाव मिळू लागला आहे. सद्या युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. सशक्त लोकशाहीसाठी निकोप वातावरणाची गरज आहे.स्वस्तात आणि विनासायास पिस्तूल मिळत असल्याने तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही जण मध्य प्रदेश आणि बिहार या सारख्या परराज्यांतून पिस्तुलांसह घातक शस्त्रांची आयात करत असल्याची चर्चा आहे. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला मावळ तालुका भयमुक्त होणे काळाची गरज आहे. (वार्ताहर)