शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांना पकडणार कधी?

By admin | Updated: April 26, 2017 03:47 IST

मावळ तालुक्यात खून, लुटमार, जबरी चोरी व दरोड्याचे सत्र सुरू असून, सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे.

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात खून, लुटमार, जबरी चोरी व दरोड्याचे सत्र सुरू असून, सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. तालुक्यातील गुन्हेगारीचा हा वाढता आलेख रोखणे पोलीस खात्यापुढे मोठे आव्हान आहे. चोरटे आणि दरोडेखोरांच्या पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळणे गरजेचे आहे. धामणे येथील फाले कुटुंबीयांवर मंगळवारी ओढवलेला दरोड्याचा प्रकार म्हणजे तळेगाव पोलिसांची अकार्यक्षमता वेशीला टांगल्यागतच जमा आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये दारुंब्रे येथील वाघोले वस्तीजवळ जडी-बुटीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या तंबूत घुसून सहा दरोडेखोरांनी चाकुुचा धाक दाखवून, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत सव्वालाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले. मंगळवारी ७ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास दरोड्याचा हा प्रकार घडला. लुटमारीसाठी दरोडेखोरांनी युको गाडीचा वापर केला. या संदर्भात रुमाबाई चितोडिया यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अडीच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही पोलिसांना या दरोड्याचा तपास लावता आला नाही. पोलिसांचा चोरट्यांवर वचक राहिलेला दिसत नाही. मंगळवारी पहाटे धामणे येथे सशस्त्र दरोड्यात फाले परिवारातील तीन निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. योगायोग म्हणजे दारुंब्रे व धामणे येथे पडलेले दरोडे मंगळवारी पहाटे पडलेले आहेत. दरोडेखोरांना पायबंद घालणे पोलिसांपुढील मोठी डोकेदुखी ठरत आहे. तालुक्यातील वाढत्या चोऱ्या, हत्या, खून व दरोडे हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. तालुक्यातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य माणूस धास्तावला गेला आहे. माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची पूर्ववैमनस्यातून भर दिवसा झालेली निर्घृण हत्या तालुका विसरलेला नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये चेतन दत्तात्रय पिंजण (वय १७) या इंद्रायणी महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्याच दोन मित्रांनी किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून महाविद्यालय परिसरात भरदिवसा खून केला. तालुक्यातील गुन्हेगारी व हिंसक प्रवृत्तीत दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंतनीय बाब बनली आहे. तालुक्यात गुन्हेगारीचे जाळेच पसरले आहे. लुटमार, खून, हत्या यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तालुक्यातील वातावरण दूषित झाले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. सध्या मावळला निकोप वातावरणाची गरज आहे. युवा पिढी बिघडू लागल्याने समाजाची मोठी हानी होणार आहे. मावळात जमीन व्यवहारातून आर्थिक सुबत्ता आलेली आहे. एकत्र कुटुंबपद्धती इतिहास जमा होऊ लागली आहे. जमिनीचे तुकडीकरण वाढले. जमीन तुकड्याला सोन्याचा भाव मिळू लागला आहे. सद्या युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. सशक्त लोकशाहीसाठी निकोप वातावरणाची गरज आहे.स्वस्तात आणि विनासायास पिस्तूल मिळत असल्याने तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही जण मध्य प्रदेश आणि बिहार या सारख्या परराज्यांतून पिस्तुलांसह घातक शस्त्रांची आयात करत असल्याची चर्चा आहे. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला मावळ तालुका भयमुक्त होणे काळाची गरज आहे. (वार्ताहर)