शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सांडपाण्याने वाढली जलपर्णी; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषणात होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 01:14 IST

दूषित पाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य

- विलास भेगडेतळेगाव दाभाडे : इंद्रायणी नदीपात्रात सांगवी ते इंदोरी या सुमारे १२ किमीच्या टप्प्यात नदीकाठावरील गावांचे मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात असल्याने या भागातील नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे.नदीकाठावर सांगवी, कातवी, वारंगवाडी, आंबी, वराळे, नाणोली तर्फे चाकण, तळेगाव दाभाडे, माळवाडी, इंदोरी ही गावे वसलेली आहेत. यातील बहुतेक गावांतील सांडपाणी नैसर्गिक उतारामुळे सरळ इंद्रायणी नदीपात्रात जात आहे. यामुळे जलपर्णी वाढली असून, डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पावसाळ्यात इंद्रायणी नदीत वाहून येत असलेल्या जलपर्णी, मैलायुक्त सांडपाणी,कचरा यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले असून वेळीच दखल न घेतल्यास इंद्रायणीची गटारगंगा होण्यास वेळ लागणार नाही. तळेगाव स्टेशनसह अनेक गावांचे मैलायुक्त सांडपाणी नदीपात्रात जात असल्याने प्रदूषणात भरच पडली आहे. आंबीसह आंबी एमआयडीसीचे दूषित पाणी इंद्रायणी नदीपात्रात येते.आंबी आणि इंदोरी येथे जनावरे धुण्याचे प्रमाण अधिक आहे. नदीकाठावर महिला मोठ्या प्रमाणावर धुणी-भांडी करताना दिसतात. नदीपात्रात सर्रास जनावरे धुतली जात आहेत. कारखानदारीचे दूषित पाणी, काठावरील गावांचे सांडपाणी, नदीपात्रात सोडल्याने होणारे परिणाम माहिती असूनही या गंभीर बाबीची दखल ग्रामस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाकडूनही घेतली जात नाही. तळेगाव नगर परिषद हद्दीतील मोठया प्रमाणात सांडपाणी ओढ्यामार्गे इंद्रायणी नदीतच येते. शिवाय अंत्यविधीनंतरची राख, निर्माल्य, धुणीभांडी व जनावरे धुणे आदी कारणांनी इंद्रायणी प्रदूषणात भर पडते. अनेक भाविक इंदोरी पुलाजवळ अंत्यविधीनंतरची राख सोडतात. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचे अधिक प्रदूषण झाले आहे.वारंगवाडी ते इंदोरी या टप्प्यातील इंद्रायणीमुळे सुमारे ८० टक्के क्षेत्र बागायती झाले असले, तरी शेतकऱ्यांना नाईलाजाने हे दूषित पाणीच भाजीपाला व बागायती क्षेत्राला द्यावे लागत आहे. नदीकाठावरील बहुतेक गावांचा नळपाणीपुरवठा इंद्रायणी नदीवरच अवलंबून आहे. अनेक ग्राम पंचायतींकडे सक्षम जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडindrayaniइंद्रायणीwater pollutionजल प्रदूषण