शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तळेगावात १५ जूनपासून पुरेसा पाणीपुरवठा

By admin | Updated: May 31, 2017 02:04 IST

गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा प्रश्नास सर्वोच्च प्राधान्य देत यंत्रणेतील दोष दूर करून तळेगाव

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा प्रश्नास सर्वोच्च प्राधान्य देत यंत्रणेतील दोष दूर करून तळेगाव आणि स्टेशन विभागातील नागरिकांना येत्या १५ जूनपर्यंत पुरेसा, सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात पवना व इंद्रायणी नदीवरील पंपासाठी २४ तास वीजपुरवठा करणारे एक्स्प्रेस फीडर्स बसविण्यात आले असून, त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उचलणे शक्य होणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती सुनील शेळके यांनी दिली.भाजपा, तळेगाव शहर जनसेवा विकास समिती आणि आरपीआय यांच्या गेल्या पाच महिन्यांतील सत्ताकाळातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेळके यांनी ही माहिती दिली. या वेळी आमदार बाळा भेगडे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सभागृह नेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेविका सुलोचना आवारे, नगरसेवक इंदरमल ओसवाल, सचिन टकले आदी उपस्थित होते.तळेगावातील पाणी प्रश्नाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता युद्धपातळीवर असल्याचे सांगून शेळके म्हणाले की, शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तीन टप्प्यात पाणी योजनेच्या सक्षमीकरणाचा संकल्प आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १६ एमएलडी पाणी पवना नदीवरून उचलण्याची परवानगी नुकतीच प्राप्त केली आहे. इंद्रायणी नदीवरूनही १० एमएलडी पाणी उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा सुसज्ज केली आहे. एक्स्प्रेस फीडर्समुळे अखंडित वीजपुरवठा प्राप्त झाला असून त्यामुळे संपूर्ण शहरास नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. येत्या ७ जून रोजी त्याचे उद्घाटन होत आहे.तळेगाव शहरासाठी दीर्घकालीन इंद्रायणी योजनेसाठी ६३ कोटी रुपये खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिल्याचे आमदार भेगडे यांनी सांगितले.स्मार्ट नियोजनाने मोठी बचतपाणी योजनेतील दुरुस्ती, सुधारणा आणि सक्षमीकरण करताना स्मार्ट नियोजन केल्याने खर्चात मोठी बचत झाली आहे. इंद्रायणी योजनेची पाणी क्षमता ५ एमएलडीवरून १० एमएलडी करण्यासाठी २ कोटी ९३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, ती केवळ ६४ लाखातच पूर्ण केली. दोन कोटी २० लाख रुपयांची बचत केली. सोमाटणे पंपासाठी दरमहा १९ लाख रुपये वीजबिलाचा खर्च येतो. त्यात तांत्रिक बदल केल्याने सुमारे चार लाखाची बचत होणार आहे. अतिरिक्त पाणी उचलले गेल्याने गेली चारपाच वर्षे दरमहा ५५ हजार रुपयांचा दंड जीवन प्राधिकरणाकडे भरावा लागत असे. आता जादा पाणी उचलण्याची परवानगी प्राप्त केल्याने तो खर्चही वाचणार आहे. याच पंपावरील मोटारीसाठीच्या एक कोटी ९३ लाख खर्चातून ४६ लाख रुपयांची बचत केली आहे. पुढील वर्षात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा संकल्प आहे. - सुनील शेळके, उपनगराध्यक्ष