शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पाणीपुरवठा विभागास टाळे; धरण भरूनही अनियमित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 03:41 IST

पवना धरण भरले असतानाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावाने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला

पिंपरी : पवना धरण भरले असतानाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभावाने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने संताप व्यक्त केला असून, महापालिका भवनातराष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला टाळे ठोकले. आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा होता. धरण ९७ टक्के भरले आहे. मात्र, शहरातील एकाही भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. विस्कळीत पाणीपुरवठ्याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाला कुलूप लावण्यात आले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी महापौर अपर्णा डोके, मोरेश्वरभोंडवे, मयूर कलाटे, सुलक्षणा शिलवंत, गीता मंचरकर, विनया तापकीर, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, जावेद शेख, समीर मासूळकर, पौर्णिमा सोनवणे, अनुराधा गोफणे आदी उपस्थित होते. त्यानंतर आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.दत्ता साने म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत नगरसेवकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. याची दखल घेऊन महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभागात पाणीपुरवठा विस्कळीत करीत आहेत. यापाठीमागे राजकीय षड्यंत्र आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. नागरिकांना वेठीस धरणे योग्य बाब नाही.’’हे तर पाण्याचे राजकारणराष्ट्रवादी १५ वर्षे सत्तेत होती. मात्र, त्या काळात त्यांना आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणता आले नाही. तसेच, पवना बंद जलवाहिनी योजना पूर्ण करता आली नाही. अद्याप दहा लाख लोकसंख्येप्रमाणे तेवीस लाख लोकसंख्येच्या वाढत्या शहराला पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरातील काही भागांत तांत्रिक कारणाने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्याच्यामुळेच परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यावरून राजकारण करू नये. पुढील आठवड्यात आंद्रा व भामा-आसखेड धरणातील पाणी साठ्याला परवानगी देण्याबाबत बैठक आहे. त्यात अंतिम निर्णय होईल, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड