शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महापौरांच्या टँकरसाठी पाणीटंचाई

By admin | Updated: May 28, 2017 03:54 IST

पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी कपातीवरून भाजपा आणि शिवसेनेत जुंपली आहे. आळंदीला पाणी देताना पिंपरी-चिंचवडकरांवर अन्याय का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. ‘महापौर नितीन काळजे यांच्या पाण्याच्या टँकरसाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे, असा आरोप शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी केला आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचे कारण पुढे करून महापौरांनी दिवसाआड पाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिनाभराचा कालखंड होत आला तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाणीपुरवठा विभागाला कोणीही वाली नसल्याने, वचक नसल्याने त्याचा परिणाम शहरातील नागरिकांवर होत आहे. महापौर आयुक्तांनी बैठक घेऊनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पिंपरी-चिंचवडला पाणी पुरेसे नसताना महापौरांनी आळंदीला पाणी देण्याचा निर्णय घेतला. याबाबत ‘लोकमत’नेही टँकर माफीयांचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी टँकर लॉबीसाठी पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र,महापौरांनी हा आरोप धुडकावून लावला. कोणतीही टँकर लॉबी कार्यरत नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. शहरप्रमुख राहुल कलाटे म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे वास्तव सत्ताधारी आणि प्रशासन मान्य करीत नाहीत. टँकर लॉबीसाठी पाणीटंचाई केली जात आहे. नागरिकांना वेठीस धरणे योग्यनाही. शनिवारी पुणे वेधशाळेने सरासरीच्या शंभर टक्के पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा विचार करता शहरवासीयांवर लादलेली पाणी कपात त्वरित मागे घ्यावी, अन्यथा पुढील आठवड्यात हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू.’’शिवसेनेचे पदाधिकारी निवडणुकीत झालेला पराजय व नैराश्यातून आरोप केले जात आहेत. उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार आहे. माझे कोठे आणि कोणते टँकर आहेत. हे दाखवून द्यावे. उगाच खोटे आरोप करू नयेत.- नितीन काळजे, महापौर. महापौर नितीन काळजे यांचाच टँकरने पाणी पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्याच्यासाठीच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे. आळंदीला पाणी देण्यास विरोध नाही. लोकसभेसाठी हे पाणी दिले जात असेल तर जुन्नर आणि शिरूरपर्यंत पाणी द्यावे. - सुलभा उबाळे, माजी गटनेत्या, शिवसेना