शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या टँकरसाठी पाणीटंचाई

By admin | Updated: May 28, 2017 03:54 IST

पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी कपातीवरून भाजपा आणि शिवसेनेत जुंपली आहे. आळंदीला पाणी देताना पिंपरी-चिंचवडकरांवर अन्याय का? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे. ‘महापौर नितीन काळजे यांच्या पाण्याच्या टँकरसाठी दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे, असा आरोप शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी केला आहे. पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचे कारण पुढे करून महापौरांनी दिवसाआड पाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिनाभराचा कालखंड होत आला तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाणीपुरवठा विभागाला कोणीही वाली नसल्याने, वचक नसल्याने त्याचा परिणाम शहरातील नागरिकांवर होत आहे. महापौर आयुक्तांनी बैठक घेऊनही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. पिंपरी-चिंचवडला पाणी पुरेसे नसताना महापौरांनी आळंदीला पाणी देण्याचा निर्णय घेतला. याबाबत ‘लोकमत’नेही टँकर माफीयांचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी टँकर लॉबीसाठी पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र,महापौरांनी हा आरोप धुडकावून लावला. कोणतीही टँकर लॉबी कार्यरत नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. शहरप्रमुख राहुल कलाटे म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे वास्तव सत्ताधारी आणि प्रशासन मान्य करीत नाहीत. टँकर लॉबीसाठी पाणीटंचाई केली जात आहे. नागरिकांना वेठीस धरणे योग्यनाही. शनिवारी पुणे वेधशाळेने सरासरीच्या शंभर टक्के पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा विचार करता शहरवासीयांवर लादलेली पाणी कपात त्वरित मागे घ्यावी, अन्यथा पुढील आठवड्यात हंडा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू.’’शिवसेनेचे पदाधिकारी निवडणुकीत झालेला पराजय व नैराश्यातून आरोप केले जात आहेत. उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार आहे. माझे कोठे आणि कोणते टँकर आहेत. हे दाखवून द्यावे. उगाच खोटे आरोप करू नयेत.- नितीन काळजे, महापौर. महापौर नितीन काळजे यांचाच टँकरने पाणी पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्याच्यासाठीच नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे. आळंदीला पाणी देण्यास विरोध नाही. लोकसभेसाठी हे पाणी दिले जात असेल तर जुन्नर आणि शिरूरपर्यंत पाणी द्यावे. - सुलभा उबाळे, माजी गटनेत्या, शिवसेना