शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पाणी समस्येच्या तक्रारी, आरोपांनी सत्ताधारी हैराण

By admin | Updated: May 31, 2017 02:21 IST

पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काटकसरीच्या धोरणानुसार एक दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मात्र, हा सर्व

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काटकसरीच्या धोरणानुसार एक दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मात्र, हा सर्व खटाटोप टँकर लॉबीसाठी आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आळंदीला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला, असे आरोप होऊ लागले आहेत. आरोप करण्यापेक्षा ज्या भागात पाणी नाही, त्याबद्दल कळवा, उपाययोजना केली जाईल. पाणी कपात रद्दसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे महापौर नितीन काळजे, सभागृहनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. शहरात २ मे पासून दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महापौर आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या टँकर लॉबीसाठीच पाणीकपात करीत आहेत, असा थेट आरोप विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे मंगळवारी आयुक्त दालनात पाणीपुरवठा विषयक तातडीची बैठक घेण्यात आली.महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर शैलजा मोरे, सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेविका सुमन पवळे, नामदवे ढाके यांच्यासह आयुक्त श्रावण हर्डीकर, सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते. महापौर काळजे म्हणाले, पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागू नये म्हणून २५ टक्के पाणीकपात केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. यापुढील काळात २५ टक्के पाणी कपात कमी करून ती १० टक्यांवर आणली जाईल. ज्या परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे. त्या परिसरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. नळांना विद्युत मोटार लावून उपसा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाचा अंदाज आल्यावर पाणीकपात रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. येत्या आठ दिवसांत आढावा घेणार असल्याचे महापौर काळजे यांनी सांगितले. तक्रारीसाठी हेल्पलाइन, दिवसाआडच पाणीपुरवठा पाणीपुरवठ्याच्या अधिक तक्रारी ज्या प्रभागातून येतील त्या प्रभागातील कनिष्ठ अभियंता, व्हॉल्व्हमन यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विषयक बैठकीत दिले.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, रोज पाणीपुरवठा सुरू असताना ४७० एमएलडी पाणीउपसा केला जातो. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. त्यामुळे पवना धरणातून आता ३९० ते ४०० एमएलडी पाणीउपसा केला जात आहे. या बैठकीनंतर त्यात १० टक्के वाढ केली जाईल. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये घट होईल.नागरिकांनी पाणी पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी ७७२२०६०९९९ या हेल्पलाइन क्रमांकावर कराव्यात. त्याची दखल घेऊन तातडीने निराकरण केले जाईल. जून- जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी दिवसाआडच पाणीपुरवठा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.