शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी समस्येच्या तक्रारी, आरोपांनी सत्ताधारी हैराण

By admin | Updated: May 31, 2017 02:21 IST

पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काटकसरीच्या धोरणानुसार एक दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मात्र, हा सर्व

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काटकसरीच्या धोरणानुसार एक दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मात्र, हा सर्व खटाटोप टँकर लॉबीसाठी आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आळंदीला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला, असे आरोप होऊ लागले आहेत. आरोप करण्यापेक्षा ज्या भागात पाणी नाही, त्याबद्दल कळवा, उपाययोजना केली जाईल. पाणी कपात रद्दसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे महापौर नितीन काळजे, सभागृहनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. शहरात २ मे पासून दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महापौर आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या टँकर लॉबीसाठीच पाणीकपात करीत आहेत, असा थेट आरोप विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे मंगळवारी आयुक्त दालनात पाणीपुरवठा विषयक तातडीची बैठक घेण्यात आली.महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर शैलजा मोरे, सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेविका सुमन पवळे, नामदवे ढाके यांच्यासह आयुक्त श्रावण हर्डीकर, सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते. महापौर काळजे म्हणाले, पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागू नये म्हणून २५ टक्के पाणीकपात केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. यापुढील काळात २५ टक्के पाणी कपात कमी करून ती १० टक्यांवर आणली जाईल. ज्या परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे. त्या परिसरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. नळांना विद्युत मोटार लावून उपसा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाचा अंदाज आल्यावर पाणीकपात रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. येत्या आठ दिवसांत आढावा घेणार असल्याचे महापौर काळजे यांनी सांगितले. तक्रारीसाठी हेल्पलाइन, दिवसाआडच पाणीपुरवठा पाणीपुरवठ्याच्या अधिक तक्रारी ज्या प्रभागातून येतील त्या प्रभागातील कनिष्ठ अभियंता, व्हॉल्व्हमन यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विषयक बैठकीत दिले.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, रोज पाणीपुरवठा सुरू असताना ४७० एमएलडी पाणीउपसा केला जातो. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. त्यामुळे पवना धरणातून आता ३९० ते ४०० एमएलडी पाणीउपसा केला जात आहे. या बैठकीनंतर त्यात १० टक्के वाढ केली जाईल. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये घट होईल.नागरिकांनी पाणी पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी ७७२२०६०९९९ या हेल्पलाइन क्रमांकावर कराव्यात. त्याची दखल घेऊन तातडीने निराकरण केले जाईल. जून- जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी दिवसाआडच पाणीपुरवठा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.