शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी समस्येच्या तक्रारी, आरोपांनी सत्ताधारी हैराण

By admin | Updated: May 31, 2017 02:21 IST

पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काटकसरीच्या धोरणानुसार एक दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मात्र, हा सर्व

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पाणीटंचाई जाणवू नये म्हणून काटकसरीच्या धोरणानुसार एक दिवासाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले. मात्र, हा सर्व खटाटोप टँकर लॉबीसाठी आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आळंदीला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला, असे आरोप होऊ लागले आहेत. आरोप करण्यापेक्षा ज्या भागात पाणी नाही, त्याबद्दल कळवा, उपाययोजना केली जाईल. पाणी कपात रद्दसाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे महापौर नितीन काळजे, सभागृहनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. शहरात २ मे पासून दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महापौर आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या टँकर लॉबीसाठीच पाणीकपात करीत आहेत, असा थेट आरोप विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे मंगळवारी आयुक्त दालनात पाणीपुरवठा विषयक तातडीची बैठक घेण्यात आली.महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर शैलजा मोरे, सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेविका सुमन पवळे, नामदवे ढाके यांच्यासह आयुक्त श्रावण हर्डीकर, सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते. महापौर काळजे म्हणाले, पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागू नये म्हणून २५ टक्के पाणीकपात केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. यापुढील काळात २५ टक्के पाणी कपात कमी करून ती १० टक्यांवर आणली जाईल. ज्या परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे. त्या परिसरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. नळांना विद्युत मोटार लावून उपसा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाचा अंदाज आल्यावर पाणीकपात रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. येत्या आठ दिवसांत आढावा घेणार असल्याचे महापौर काळजे यांनी सांगितले. तक्रारीसाठी हेल्पलाइन, दिवसाआडच पाणीपुरवठा पाणीपुरवठ्याच्या अधिक तक्रारी ज्या प्रभागातून येतील त्या प्रभागातील कनिष्ठ अभियंता, व्हॉल्व्हमन यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे आदेश महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विषयक बैठकीत दिले.पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, रोज पाणीपुरवठा सुरू असताना ४७० एमएलडी पाणीउपसा केला जातो. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. त्यामुळे पवना धरणातून आता ३९० ते ४०० एमएलडी पाणीउपसा केला जात आहे. या बैठकीनंतर त्यात १० टक्के वाढ केली जाईल. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये घट होईल.नागरिकांनी पाणी पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी ७७२२०६०९९९ या हेल्पलाइन क्रमांकावर कराव्यात. त्याची दखल घेऊन तातडीने निराकरण केले जाईल. जून- जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी दिवसाआडच पाणीपुरवठा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.