शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्ये दिवसाआड पाणी?

By admin | Updated: March 18, 2017 04:49 IST

उन्हाळा सुरू झाला असून, पवना धरणातील सद्य:स्थिती पाहता ५१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. एप्रिल महिन्यात दिवसाआड

पिंपरी : उन्हाळा सुरू झाला असून, पवना धरणातील सद्य:स्थिती पाहता ५१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन सुरू आहे. एप्रिल महिन्यात दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात धरणातील साठा आणि पुरवठा यांचा आढावा घेण्यासाठी पाटबंधारे विभाग व महापालिका अधिकारी यांची लवकरच बैठक होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडून रावेत येथील जलउपसा केंद्रातून हे पाणी उचलले जाते. ते पाणी महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागांतील नागरिकांना पुरविले जाते. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यातच पवना धरण १०० टक्के भरले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध पाणीयोजना, तळेगाव, उर्से, वडगाव मावळ या भागातील पाणीयोजनांना वर्षभर पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे पाटबंधारे विभागाने सूचित केले होते. पवना धरणातून वीजनिर्मिती आणि पिंपरी-चिंचवडला पिण्यासाठी दिवसाला ४५० एमएलडी पाणी सोडले जाते. पवना धरणाची एकूण क्षमता १० टीएमसी आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रवीण लडकत म्हणाले, ‘‘या धरणात आजअखेर ५१ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यानच्या कालखंडात धरण १०० टक्के भरल्याने दिवसाआड पाण्याचा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर दिवसातून एकवेळ पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले होते. त्यामुळे सध्या शहरात एकवेळ पाणीपुरवठा आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. पाणीसाठा कमी झाल्यास जलसंपदा विभागाच्या वतीने महापालिकेला सूचना केली जाते. पाणी पुरवठ्यासंदर्भात पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला जाणार आहे. महिनाभरात या संदर्भात आढावा घेण्यात येणार असून, तसेच महापालिकेतील महापौर, उपमहापौर, विविध पक्षांचे गटनेते यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतरच पाणीकपातीचा निर्णय होईल. ही बैठक महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत होईल. पाण्याचे आपत्कालीन नियोजन पवना धरणातील पाणीसाठा हा जून अखेरपर्यंत पुरणार आहे. मात्र, याबाबत पाटबंधारे आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली जाईल. धरणातील पाणीसाठा आणि पावसाचा अंदाज घेऊन, साठा किती दिवस पुरेल याचा आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेतला जाईल. पाण्याचे आपत्कालीन नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)जूनअखेरपर्यंत पुरेल इतका साठापवनानगर : पवना धरणात ५१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून जूनअखेरपर्यंत पाण्याची चिंता नाही. पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणात या वर्षी समाधानकारक साठा शिल्लक आहे. धरणाची साठवण क्षमता १० टीएमसी असून पाच टीएमसी पाणी शिल्लक आहे. पाणी पातळी ६०७ मीटर इतकी असून, १२३ मीटर इतका उपयुक्त साठा आहे. तर मागील वर्षी १६ मार्चअखेर ३९% पाणी साठा शिल्लक होता. त्या तुलनेत १२% इतका पाणी साठा जादा आहे. धरणातून दररोज १२०० क्युसेकने ७ तास पाणी विसर्ग केला जात आहे. या वर्षी २४१८ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता. त्यामुळे धरण १००% भरले होते, तर गतवर्षी ते ८०% भरले होते. (वार्ताहर)धरणात ५१ % इतका पाणी साठा शिल्लक असला तरी पाण्याची काटकसर करण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे शिवाय पुढे पाऊस कधी येईल, किती पाऊस पडेल या बाबत नक्की काही सांगता येणार नाही. त्यामुळे महापालिका व पाटबंधारे विभागाला आपत्कालीन नियोजन करावे लागणार आहे. तसेच नागरिकांनी काटकसर करून पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. - मनोहर खाडे, शाखा अभियंता