शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कचरा समस्या तीन महिन्यांत सुटणार - श्रावण हर्डीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:53 IST

कचरा व्यवस्थापनाबाबत आणि निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत शहरातील कचरा समस्या आणि आरोग्य प्रश्न सोडविण्यात यश येईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पिंपरी : कचरा व्यवस्थापनाबाबत आणि निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून नवीन निविदाप्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत शहरातील कचरा समस्या आणि आरोग्य प्रश्न सोडविण्यात यश येईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्याचा आरोग्य विभाग उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याची कबुली त्यांनी दिली.महापालिकेच्या आरोग्य विभागाबाबत महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेतही चर्चा झाली आहे. महापालिकेच्या वतीने नियुक्त केलेल्या संस्था नियमितपणे घरोघरचा कचरा उचलत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. याबाबत नगरसेवकांनी तक्रारी केल्या होत्या. कचरा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली होती. त्याबाबत आयुक्त म्हणाले, ‘‘आरोग्याविषयी नागरिक आणि नगरसेवकांच्या तक्रारी आल्या आहेत. मनुष्यबळ कमी पडत आहे. तसेच गाड्यांची कमतरता आहे. यापूर्वी कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रिया आणि कामातही त्रुटी होत्या. त्या दूर करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू झालेले आहे. कचरा प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे. नवीन निविदा प्रक्रिया होऊन येत्या तीन महिन्यांत हा प्रश्न सुटेल.’’दरम्यान, शहरातील अनेक भागामध्ये कचरा गाड्या वेळेत येत नाहीत. त्यामुळे दारापुढेच कचरा पडलेला असतो. तसेच अनेक वेळा रस्त्यावरील कचरा उचलणाºया गाड्याही नियमित धावत नाहीत. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नसल्याने हाही प्रकल्प व्यवस्थित सुरू नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. प्रशासनाने आरोग्याच्या दृष्टीने कचºयाची समस्या त्वरित सोडवावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या तक्रारीची चौकशी पूर्णपंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, त्यामुळे महापालिकेची बदनामी झाली आहे. आपण कायदेशीर कारवाई करणार का, या प्रश्नावर आयुक्त म्हणाले, ‘‘टक्केवारीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयात केलेल्या तक्रारीबद्दल संबंधितांना नोटीस पाठविली होती. त्यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे सादर न केल्याने याबाबतचा अहवाल तयार करून पंतप्रधान कार्यालयास कळविले आहे. ही तक्रार मोघम स्वरूपाची आहे, असे आम्ही यापूर्वीच म्हटले होते. बदनामीविषयी कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात कोणतेही धोरण ठरविलेले नाही.’’महिलांबाबतच्या तक्रारींचीही चौकशीमहापालिका प्रशासनातील महिलांनी केलेल्या तक्रारींविषयी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहे, या प्रश्नावर आयुक्त म्हणाले, ‘‘महापालिकेतील कर्मचारी महिलांनी कोणाविषयी तक्रार केल्यानंतर या विषयी असणाºया समितीमार्फत चौकशी केली जाते. त्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्यास पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. महिलांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, म्हणून नियमावली तयार केली आहे. तसेच कर्मचारी आणि अधिकाºयांना या विषयी प्रशिक्षणही देण्यात येते. महिलांची प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेतली जाते.’’