शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

भीषण अपघाताची प्रशासन पाहतेय वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 02:52 IST

टाकवे : इंद्रायणी नदीवरील पुलाचे कठडे तुटूनही दुर्लक्ष

वडगाव मावळ : टाकवे येथील इंद्रायणी नदीवरील पुलाला आठ दिवसांपूर्वी वाहनाची धडक बसल्याने पुलाचे कठडे तुटले आहेत. या पुलावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. दुरुस्ती न केल्याने पुन्हा अपघात होऊ शकतो. प्रशासन भीषण अपघात होण्याचीच वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. बांधकाम खात्याने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनला आहे. कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो. या बाबींचा विचार करून या पुलाची दुरुस्ती करावी किंवा नवीन पूल तातडीने उभारावा, अशी मागणी सेवा फाउंडेशनचे चंद्रकांत असवले, किरण भांगरे, तानाजी मोरे, मधू कोकाटे, संतोष जांभूळकर यांनी सहा महिन्यांपूर्वी बांधकाम खात्याकडे केली होती. त्यानंतर बांधकाम खात्याने काही दिवस तुटलेल्या ठिकाणी लाल कापड गुंडाळले होते. नंतर लोखंडी अ‍ॅँगल लावले. आठ दिवसांपूर्वी एका जीपचा ब्रेक फेल झाल्याने ती कठड्याला धडकली. नदीपात्रात पडता पडता वाचली. त्यामुळे पुन्हा पाइप तुटले आहे. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात हा पूल धोकादायक असल्याची नोंद केली आहे. तरीदेखील दुरुस्तीसाठी किंवा नव्या पुलाच्या बांधकामासाठी अद्याप शासनाला जाग आली नाही. पूल कोसळल्यावर शासनाला जाग येणार का, असा सवाल फाउंडेशनच्या सदस्यांनी केला आहे. सावित्री नदी दुर्घटनेनंतर झालेल्या सर्वेक्षणात सर्वात अगोदर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे घोषित केले होते. त्याच सुमारास काही दिवस अवजड वाहतूक बंद केली होती. ती पुन्हा सुरू झाली आहे. या पुलावर रात्री अंधार असतो. त्यामुळे अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकतो. त्यासाठी पुलावर पथदिवे बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे प्रशासन कधी लक्ष देणार हे गुलदस्त्यातच आहे.माहितीचा अधिकार : निधी मंजूर नाहीपुलाच्या दुरुस्तीसाठी अगर नवीन पुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून किती निधी मंजूर झाला आहे, याबाबत सेवा फाउंडेशनचे चंद्रकांत असवले यांनी माहितीच्या आधाराखाली माहिती मागवली असता, कोणताही निधी मंजूर नसल्याचे बांधकाम खात्याने कळविले आहे. या पुलावर रात्री अंधार असतो. त्यामुळे अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकतो. त्यासाठी पुलावर पथदिवे बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड