शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

विवाहेच्छूंना प्रतीक्षा तुळशी विवाहाची, एक तारखेपासून उडणार लग्नाचे बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 06:43 IST

दिवाळीनंतर अनेकांच्या घरी विवाहाचे वेध लागले आहेत. परंतु तुळशीविवाह झाल्यानंतरच लग्न करण्याची प्रथा आहे. त्यामुळे विवाहेच्छूंना एक तारखेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

पिंपरी : दिवाळीनंतर अनेकांच्या घरी विवाहाचे वेध लागले आहेत. परंतु तुळशीविवाह झाल्यानंतरच लग्न करण्याची प्रथा आहे. त्यामुळे विवाहेच्छूंना एक तारखेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहास प्रारंभ होत आहे. या वर्षी दोन महिन्यांत विवाहाचे १२ मुहूर्त आहेत. लवकरच शहरात सनई-चौघड्याचे सूर कानी पडणार आहेत. विवाहेच्छू मुलांच्या कुटुंबीयांची प्रतीक्षा संपती आहे. मराठी महिन्यानुसार कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत विवाह पार पडतात. त्यानंतर विवाहेच्छूंच्या तारखा ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात अनेकांनी तुळशीविवाहापूर्वी साखरपुडा उरकून घेतला आहे. त्यामुळे लग्नाचे मुहूर्त ठरवून त्यानंतर मंगल कार्यालयाचे बुकिंग आणि लग्नाच्या खरेदीची लगबग शहरात पाहायला मिळणार आहे.शहरातील पुरोहितांकडे आता सोईनुसार लग्नाची तारीख ठरवण्यासाठी वधू-वर पित्यांची रीघ लागली आहे. तुळशी विवाह तसेच लग्नाचा जवळचा मुहूर्त साधण्यासाठी गर्दी होत आहे. या वर्षी लग्नासाठी १२ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर महिन्यात २१, २३, २४, २५, २८, २९ या तारखांना मुहूर्त आहे. डिसेंबर महिन्यात ३,४,१०, ११, १२ व १४ या तारखांना लग्नमुहूर्त आहेत. त्यामुळे एक तारखेपासून शहरात लग्नाचे बार उडत असल्याने विवाहेच्छूंमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.जीएसटीमुळे अनेक वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे लग्नासाठी वधू आणि वर यांचे नातेवाईक आखडता हात घेत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतही लग्नसराईसारखे वातावरण दिसत नाही.