शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वडगाव मावळ : तालुक्याच्या राजाला नाही घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:52 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दप्तरदिरंगामुळे मावळ तहसीलदार निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, भिंतींना निसर्गानेच रंग दिला आहे.

वडगाव मावळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दप्तरदिरंगामुळे मावळ तहसीलदार निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, भिंतींना निसर्गानेच रंग दिला आहे. निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे. स्वच्छ भारत सुंदर भारत असा नारा देणाºया शासनाचे निवासस्थान कधी चकाचक होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.मावळ तहसीलदार निवासस्थान इमारतीचे बांधकाम ३ जुलै १९८७ला झाले. तहसीलदार सचिन बारवकर यांनी २०१२ पर्यंत या इमारतीत वास्तव केले. तहसीलदार देवदत्त ठोंबरे, शरद पाटील, जोगेंद्र कट्यारे, रणजीत देसाई हे निवासस्थानात राहिले नाही. प्रत्येक तहसीलदाराने निवासस्थानाच्या दुरुस्तीची मागणी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.विभागाने चालढकल करत काही वर्ष घालवले. या परिसरात इमारतीची संरक्षण भिंत तुटली असून, भिंतीवर शेवाळ साचले आहे. दारे-खिडक्या तुटल्या आहेत. पावसामुळे परिसरात पाणी साचले आहे.सार्वजनिक बांधकामखात्याच्या उदासीनतेमुळे निवासस्थानाची दुरुस्ती रखडली आहे. भितींना शेवाळ असल्याने हिरवा रंग आला आहे. तहसीलदार यांना असलेले निवासस्थान असूनही दुरुस्तीअभावी भाडेतत्त्वावर राहण्याची वेळ आली आहे.मावळ तालुक्यामध्ये जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे तहसीलदार हे अत्यंत महत्त्वाचे पद बनले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी निवासस्थान असणे गरजेचे आहे. परंतु या ठिकाणी निवासस्थान उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तहसीलदारांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या