शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दिव्यांवरून रंगला कलगी तुरा, कार्यकर्त्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 03:16 IST

वडगाव मावळ येथील नगर पंचायत हद्दीत सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने लावलेले हायमास्ट दिवे मावळच्या तहसीलदारांनी अचानक बंद करून गावाला अंधाराच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये तहसीलदारांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दिवे तुम्हाला लावता येत नसतील, तर राहू द्या़

वडगाव मावळ - येथील नगर पंचायत हद्दीत सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने लावलेले हायमास्ट दिवे मावळच्या तहसीलदारांनी अचानक बंद करून गावाला अंधाराच्या खाईत लोटले आहे. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये तहसीलदारांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. दिवे तुम्हाला लावता येत नसतील, तर राहू द्या़ परंतु लावलेले दिवे विझवणारा हा तहसीलदार केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकमेव असावा असा विकास विरोधी तहसीलदाराची त्वरित बदली करावी, अशी मागणी मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.1वडगाव मावळ गावाची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन सामाजिक कार्यकर्ते मयूर ढोरे यांनी स्वखर्चाने गावातील वेगवेगळ्या २१ ठिकाणी हायमास्ट दिवे लावले आहेत. वडगावातून या कामाचे कौतुक होत असताना तहसीलदार रणजित देसाई यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता सर्व दिवे अचानक बंद करून टाकले असल्याचा आरोप ढोरे यांनी केला आहे. याच परिसरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लावलेले दिवे मात्र तहसीलदारांनी बंद केले नाहीत़ त्यामुळे असा दुजाभाव का असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करत आहेत.2तहसीलदार प्रशासकीय अधिकारी आहेत की भाजपाचे हस्तक असा सवालही निवेदनात विचारण्यात आला आहे. वडगाव नगरपंचायतीला कोणताही आर्थिक फटका न बसता सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने हे दिवे लावले होते हे दिवे तहसीलदारांनी अचानक बंद केल्याने गावात रात्रीचा भयानक अंधार पसरला आहे. भुरट्या चोऱ्यांमध्ये काही दिवसांपासून वाढ झाली आहे. रात्री गरमीच्या दिवसात महिला घरातून बाहेर जेवणानंतर फिरायला यायच्या त्या ही आता बंद झाल्या आहेत.3रात्रपाळीवरून येणाºया कामगारांमध्ये असुरक्षित वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हे दिवे बंद करणाºया विकास कामांना विरोध करणाºया तहसीलदारांची त्वरित बदली करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे बाळासाहेब ढोरे यांनी केली आहे. जर येत्या १० दिवसांत तहसीलदारांवर कारवाई झाली नाही, तर मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही त्यांनीदिला आहे.विकासाची कामे व्हावीत, यासाठी प्रशासकीय अधिकाºयांनी पुढाकार घ्याचा असतो, याउलट तहसीलदार सत्ताधारी पक्षाच्या दबावाला बळी पडून गावात झालेली विकासाची कामे बंद पाडू लागले आहेत. सत्ताधाºयांच्या दबावाला बळी पडून तहसीलदार दुजाभाव करत असल्याचा आरोप कॉँग्रेस करीत आहे. तहसीलदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.सामाजिक कार्यकर्त्यांनी लावलेले दिवे हे परवानगी न घेता नगर पंचायतच्या कनेक्शनवर लावले होते. या विरोधात नागरिकांच्या तक्रारी आल्याने हे दिवे बंद करण्यात आले. जर त्यांना दिवे लावायचे असतील, तर नगर पंचायतीमध्ये ठराव करावा लागतो त्या विभागात गरज असल्यास ठराव संमत करून दिवे लावता येतील. हे दिवे नगर पंचायत कनेक्शनवर लावले असल्याने बंद करण्यात आले आहेत. वडगावमध्ये असे इतर अनधिकृत दिवे असल्यास तेही नागरिकांच्या तक्रारीनुसार बंद करण्यात येतील.- रणजीत देसाई, तहसीलदार,वडगाव मावळ

टॅग्स :newsबातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड