शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसातील सभेत विश्वंभर चौधरींनी सरकारला ‘धुतले’

By नारायण बडगुजर | Updated: January 6, 2024 22:16 IST

पिंपरीतील सभेत अवकाळीमुळे भिजलेल्या नागरिकांकडून घोषणांचा पाऊस

पिंपरी : ‘‘पावसात चाललेल्या सभांचे निकाल नंतर चांगले येतात’’, असे म्हणत विचारवंत डाॅ. विश्वंभर चौधरी यांनी स्वत: १५ मिनिटे झालेल्या भर पावसात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर मोठी टीका करत धुतले. तर ज्या खुर्च्यांवर नागरिक बसले होते त्याच खुर्च्या डोक्यावर धरून भर पावसात त्यांनी भाषण ऐकले. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे अवकाळी पावसात झालेली ही सभा गाजली.

निर्भय बनो आंदोलन, इंडिया आघाडी पिंपरी-चिंचवड शहर सर्व घटक पक्ष व सामाजिक संस्था संघटना व कार्यकर्ते यांच्यातर्फे शनिवारी पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘निर्भय बनो’ सभा झाली. त्यावेळी डाॅ. विश्वंभर चौधरी बोलत होते. मानव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कायदे तज्ज्ञ ॲड. असीम सरोदे, उत्पल वनिता बाबुराव, मारुती भापकर आदी उपस्थित होते.  

डाॅ. विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘‘निवडणुकीमुळे हे वर्ष महत्त्वपूर्ण आहे. आपण सजग राहून मतदान केले पाहिजे. राजकारणातील दुष्ट प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आहे. राजकीय पक्ष, व्यवस्था त्यांच्या पद्धतीने लढत आहेत. मात्र, ‘आम्ही भारताचे लोक’ या नात्याने आपण पुढे आले पाहिजे. त्यासाठी ‘निर्भय बनो’ सभा घेण्यात येत आहेत. सिन्नर येथील सभेत माझ्यावर हल्ला झाला. यातील हल्लेखोरांची नावे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली. मात्र, त्यांनी कारवाई केली नाही. काही मोजक्याच उद्योजकांच्या भांडवलावर भाजपाचे सरकार चालत आहे.  

हिंदूंना मारणारे हिंदू व्हायचे नाही

रामनवमीला डीजे कशाला पाहिजे, असे मी म्हणालो, त्यामुळे माझ्यावर सिन्नरच्या सभेत हल्ला झाला. हे हिंदूवादी आहेत की डीजेवादी आहेत, हेच त्यांना कळलेले नाही. मी हिंदू आहे पण नथूरामाचा हिंदू नव्हे तर गांधीजींचा हिंदू आहे. महात्मा गांधी हे हिंदू होते. तरीही त्यांना नथूराम गोडसेने मारले. पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी हे देखील हिंदूच होते. हिंदूंना मारणारे हिंदू आम्हाला व्हायचे नाही, असे विश्वंभर चौधरी म्हणाले.

सावरकर, जिनांचे शत्रू गांधी होते

हिंदू महासभेने मुस्लिम लिगबरोबर युती करून प्रांतिक निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यांचा शत्रू गांधीजी होते. तसेच सावकर व जिना यांचेही शत्रू गांधीजी होते. रामनवमीला राम मंदिराचे उद्घाटन करता आले असते. मात्र, निवडणुकांमुळे ते लवकर केले जात आहे. यातील राजकीय स्वार्थाला आमचा विरोध आहे, असे देखील विश्वंभर चौधरी म्हणाले.  

पावसातही झोडपून काढले  

सभेदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. १५ मिनिटे सुरू असलेल्या या पावसात खुर्च्या डोक्यावर घेऊन नागरिकांनी विचारवंत डाॅ. विश्वास चौधरी यांचे भाषण ऐकले. यावेळी चौधरी यांनी राज्यातील महायुती सरकार व केंद्रातील भाजपा सरकार यांच्यावर टीका केली.

टॅग्स :Rainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड