शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

भर पावसातील सभेत विश्वंभर चौधरींनी सरकारला ‘धुतले’

By नारायण बडगुजर | Updated: January 6, 2024 22:16 IST

पिंपरीतील सभेत अवकाळीमुळे भिजलेल्या नागरिकांकडून घोषणांचा पाऊस

पिंपरी : ‘‘पावसात चाललेल्या सभांचे निकाल नंतर चांगले येतात’’, असे म्हणत विचारवंत डाॅ. विश्वंभर चौधरी यांनी स्वत: १५ मिनिटे झालेल्या भर पावसात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर मोठी टीका करत धुतले. तर ज्या खुर्च्यांवर नागरिक बसले होते त्याच खुर्च्या डोक्यावर धरून भर पावसात त्यांनी भाषण ऐकले. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे अवकाळी पावसात झालेली ही सभा गाजली.

निर्भय बनो आंदोलन, इंडिया आघाडी पिंपरी-चिंचवड शहर सर्व घटक पक्ष व सामाजिक संस्था संघटना व कार्यकर्ते यांच्यातर्फे शनिवारी पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘निर्भय बनो’ सभा झाली. त्यावेळी डाॅ. विश्वंभर चौधरी बोलत होते. मानव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कायदे तज्ज्ञ ॲड. असीम सरोदे, उत्पल वनिता बाबुराव, मारुती भापकर आदी उपस्थित होते.  

डाॅ. विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘‘निवडणुकीमुळे हे वर्ष महत्त्वपूर्ण आहे. आपण सजग राहून मतदान केले पाहिजे. राजकारणातील दुष्ट प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आहे. राजकीय पक्ष, व्यवस्था त्यांच्या पद्धतीने लढत आहेत. मात्र, ‘आम्ही भारताचे लोक’ या नात्याने आपण पुढे आले पाहिजे. त्यासाठी ‘निर्भय बनो’ सभा घेण्यात येत आहेत. सिन्नर येथील सभेत माझ्यावर हल्ला झाला. यातील हल्लेखोरांची नावे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली. मात्र, त्यांनी कारवाई केली नाही. काही मोजक्याच उद्योजकांच्या भांडवलावर भाजपाचे सरकार चालत आहे.  

हिंदूंना मारणारे हिंदू व्हायचे नाही

रामनवमीला डीजे कशाला पाहिजे, असे मी म्हणालो, त्यामुळे माझ्यावर सिन्नरच्या सभेत हल्ला झाला. हे हिंदूवादी आहेत की डीजेवादी आहेत, हेच त्यांना कळलेले नाही. मी हिंदू आहे पण नथूरामाचा हिंदू नव्हे तर गांधीजींचा हिंदू आहे. महात्मा गांधी हे हिंदू होते. तरीही त्यांना नथूराम गोडसेने मारले. पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी हे देखील हिंदूच होते. हिंदूंना मारणारे हिंदू आम्हाला व्हायचे नाही, असे विश्वंभर चौधरी म्हणाले.

सावरकर, जिनांचे शत्रू गांधी होते

हिंदू महासभेने मुस्लिम लिगबरोबर युती करून प्रांतिक निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यांचा शत्रू गांधीजी होते. तसेच सावकर व जिना यांचेही शत्रू गांधीजी होते. रामनवमीला राम मंदिराचे उद्घाटन करता आले असते. मात्र, निवडणुकांमुळे ते लवकर केले जात आहे. यातील राजकीय स्वार्थाला आमचा विरोध आहे, असे देखील विश्वंभर चौधरी म्हणाले.  

पावसातही झोडपून काढले  

सभेदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. १५ मिनिटे सुरू असलेल्या या पावसात खुर्च्या डोक्यावर घेऊन नागरिकांनी विचारवंत डाॅ. विश्वास चौधरी यांचे भाषण ऐकले. यावेळी चौधरी यांनी राज्यातील महायुती सरकार व केंद्रातील भाजपा सरकार यांच्यावर टीका केली.

टॅग्स :Rainपाऊसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड