शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

सद्गुणांचे कौतुक करायला हवे- श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:23 IST

पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे. भक्ती आणि शक्तीचे अनोखे स्मारक निगडीत उभारले आहे. सेवाभाव, सेवावृत्ती येथे अधिक प्रमाणावर दिसून येते. सद्गुणांचे कौतुक करायला हवे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात व्यक्त केले.महापालिका उद्यान विभाग आणि भंडारा डोंगर दशमी समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, रजनीताई पाटील, उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे, माजी आमदार विलास लांडे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, विजय बोत्रे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तानाजी शिंदे, उद्यान विभागाचे अधीक्षक सुरेश साळुंखे, माजी महापौर मंगला कदम, मोहिनी लांडे, शंकरमहाराज शेवाळे, श्रीक्षेत्र पंढरपूर देवस्थानाचे विश्वस्त शिवाजीमहाराज मोरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमन पवळे उपस्थित होते. जोपा पवार यांचा गौरव राज्यपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.काशीद म्हणाले, ‘‘नि:स्पृह भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यात आला. आजच्या जगात सेवाभाव जपण्याची गरज आहे.’’लांडे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडच्या विकासात श्रीनिवास पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. सेवावृत्तीने काम करणाºया व्यक्तीचा सत्कार, गौरव झाला. हा सद्गुणांचा गौरव आहे.’’ संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले.उद्योगनगरीत आपुलकी आणि जिव्हाळाराज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदायाचा स्थायिभाव सेवा हा आहे. पिंपरी-चिंचवडचा विकास मोठ्या वेगात झाला आहे. गावांचे शहरीकरण होत असताना सकाळी दूधविक्री, दिवसभर श्रम करून सायंकाळी भजन-कीर्तन या परिसरातील माणसे करीत असत. आपुलकी आणि जिव्हाळा होता. त्या काळचे पालिकेतील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी सेवाभाव वृत्तीने काम करीत होते. आपल्या गाडीने अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महापालिकेत येत असत. घरून आणलेले जेवण करीत असत. संस्कार आणि सेवाभाव टिकून आहे. सेवाभाव वृत्ती आणि माणूसपण जपणारी माणसे या परिसरात काम करताना मिळाली. त्यामुळेच विकासात योगदान देऊ शकलो. समाजातील चांगुलपणाचे कौतुक करायला हवे. सेवाभाव, सेवा वृत्ती वाढवायला हवी. सद्गुणांचे कौतुक करायला हवे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड