शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
5
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
6
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
7
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
8
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
9
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
10
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
11
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
12
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
13
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
14
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
15
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
16
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
17
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
18
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
19
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
20
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !

सद्गुणांचे कौतुक करायला हवे- श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:23 IST

पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे. भक्ती आणि शक्तीचे अनोखे स्मारक निगडीत उभारले आहे. सेवाभाव, सेवावृत्ती येथे अधिक प्रमाणावर दिसून येते. सद्गुणांचे कौतुक करायला हवे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात व्यक्त केले.महापालिका उद्यान विभाग आणि भंडारा डोंगर दशमी समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, रजनीताई पाटील, उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे, माजी आमदार विलास लांडे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, विजय बोत्रे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तानाजी शिंदे, उद्यान विभागाचे अधीक्षक सुरेश साळुंखे, माजी महापौर मंगला कदम, मोहिनी लांडे, शंकरमहाराज शेवाळे, श्रीक्षेत्र पंढरपूर देवस्थानाचे विश्वस्त शिवाजीमहाराज मोरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमन पवळे उपस्थित होते. जोपा पवार यांचा गौरव राज्यपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.काशीद म्हणाले, ‘‘नि:स्पृह भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यात आला. आजच्या जगात सेवाभाव जपण्याची गरज आहे.’’लांडे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडच्या विकासात श्रीनिवास पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. सेवावृत्तीने काम करणाºया व्यक्तीचा सत्कार, गौरव झाला. हा सद्गुणांचा गौरव आहे.’’ संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले.उद्योगनगरीत आपुलकी आणि जिव्हाळाराज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदायाचा स्थायिभाव सेवा हा आहे. पिंपरी-चिंचवडचा विकास मोठ्या वेगात झाला आहे. गावांचे शहरीकरण होत असताना सकाळी दूधविक्री, दिवसभर श्रम करून सायंकाळी भजन-कीर्तन या परिसरातील माणसे करीत असत. आपुलकी आणि जिव्हाळा होता. त्या काळचे पालिकेतील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी सेवाभाव वृत्तीने काम करीत होते. आपल्या गाडीने अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महापालिकेत येत असत. घरून आणलेले जेवण करीत असत. संस्कार आणि सेवाभाव टिकून आहे. सेवाभाव वृत्ती आणि माणूसपण जपणारी माणसे या परिसरात काम करताना मिळाली. त्यामुळेच विकासात योगदान देऊ शकलो. समाजातील चांगुलपणाचे कौतुक करायला हवे. सेवाभाव, सेवा वृत्ती वाढवायला हवी. सद्गुणांचे कौतुक करायला हवे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड