शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सद्गुणांचे कौतुक करायला हवे- श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:23 IST

पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड हे गुणी माणसांचे शहर आहे. सांप्रदायिक विचारांची माणसे येथे आहेत. संत ज्ञानेश्वरमहाराजांची आळंदी आणि संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांची देहू असा भक्तीचा वारसा या शहरास आहे. भक्ती आणि शक्तीचे अनोखे स्मारक निगडीत उभारले आहे. सेवाभाव, सेवावृत्ती येथे अधिक प्रमाणावर दिसून येते. सद्गुणांचे कौतुक करायला हवे, असे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात व्यक्त केले.महापालिका उद्यान विभाग आणि भंडारा डोंगर दशमी समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, रजनीताई पाटील, उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे, माजी आमदार विलास लांडे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, विजय बोत्रे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तानाजी शिंदे, उद्यान विभागाचे अधीक्षक सुरेश साळुंखे, माजी महापौर मंगला कदम, मोहिनी लांडे, शंकरमहाराज शेवाळे, श्रीक्षेत्र पंढरपूर देवस्थानाचे विश्वस्त शिवाजीमहाराज मोरे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सुमन पवळे उपस्थित होते. जोपा पवार यांचा गौरव राज्यपाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.काशीद म्हणाले, ‘‘नि:स्पृह भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्यात आला. आजच्या जगात सेवाभाव जपण्याची गरज आहे.’’लांडे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडच्या विकासात श्रीनिवास पाटील यांचे योगदान मोलाचे आहे. सेवावृत्तीने काम करणाºया व्यक्तीचा सत्कार, गौरव झाला. हा सद्गुणांचा गौरव आहे.’’ संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले.उद्योगनगरीत आपुलकी आणि जिव्हाळाराज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदायाचा स्थायिभाव सेवा हा आहे. पिंपरी-चिंचवडचा विकास मोठ्या वेगात झाला आहे. गावांचे शहरीकरण होत असताना सकाळी दूधविक्री, दिवसभर श्रम करून सायंकाळी भजन-कीर्तन या परिसरातील माणसे करीत असत. आपुलकी आणि जिव्हाळा होता. त्या काळचे पालिकेतील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी सेवाभाव वृत्तीने काम करीत होते. आपल्या गाडीने अधिकारी आणि लोकप्रतिनिधी महापालिकेत येत असत. घरून आणलेले जेवण करीत असत. संस्कार आणि सेवाभाव टिकून आहे. सेवाभाव वृत्ती आणि माणूसपण जपणारी माणसे या परिसरात काम करताना मिळाली. त्यामुळेच विकासात योगदान देऊ शकलो. समाजातील चांगुलपणाचे कौतुक करायला हवे. सेवाभाव, सेवा वृत्ती वाढवायला हवी. सद्गुणांचे कौतुक करायला हवे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड