शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

ट्रॅफिक वॉर्डनच करतात वाहनांची तपासणी

By admin | Updated: May 3, 2017 02:24 IST

सध्या शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला रहदारी वॉर्डन नेमण्यात आले आहेत

रहाटणी : सध्या शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला रहदारी वॉर्डन नेमण्यात आले आहेत. मात्र, सध्या रहदारी वॉर्डनचा उपयोग वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा इतर कामांसाठी होत आसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. सिग्नलवर उभे असलेल्या वाहनचालकांचा परवाना तपासणे, पीयूसी तपासणे, वेळप्रसंगी दंडाची पावती फाडणे इतकी कामे सर्रास रहदारी वॉर्डन करताना दिसून येत आहेत. मात्र, या सर्व प्रकारात शहरातील चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. जर ही सर्वच कामे वॉर्डन करीत असतील तर पोलिसांचे कामच काय? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत. मागील काही दिवसांपासून कोकणे चौकात वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वाहने आडवून या ना त्या कारणाने दंडाची पावती फाडत वाहनचालकांना वेठीस धरले जात आहे. काही दिवसांपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर सर्रास दंडात्मक कारवाई करताना वाहतूक पोलिस दिसून येत आहेत. अनेकवेळा एखादा वाहनचालक सिग्नलला उभा असेल तर त्याला बाजूला घेऊन त्याच्याकडे परवाना, पीयूसी यासह इतर कागदपत्रांची तपासणी केली जाते. मात्र, ही तपासणी वाहतूक पोलीस करीत नाही तर रहदारी वॉर्डन करत असल्याचा आरोप अनेक वहानचालक करीत आहेत. काहीवेळा तर चालत्या वाहनाला अडविण्याचा प्रकार केला जातो. त्यामुळे एखादा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल वाहनचालक विचारत आहेत. रहाटणी येथील कोकणे चौक, शिवार चौक, साई चौकात हा प्रकार नित्याचाच झाला आहे. या चौकात वहातूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वाहने आडविण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. रहदारी वॉर्डन वाहनाची तपासणी करून त्या संबंधित वाहनचालकांना पोलिसाकडे पाठवितो. नेहमी या चौकात तीन-चार पोलीस व दोन-तीन रहदारी वॉर्डन असतात. अनेक वेळा हे सर्व जण शिवार चौकाकडून औंधकडे वळणाच्या कडेला उभे असतात. त्यामुळे वाहन वळविताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. तपासणीसाठी आडविलेली वाहने रस्त्याच्या मधोमध उभी आसतात. त्यामुळे इतर वाहनांना रस्ताच मिळत नाही. पोलिसांना काही बोलले तर लगेच वाहन बाजूला घेण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे वहतूक पोलीस नेमके कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. हीच परिस्थिती कोकणे चौकात निदर्शनास येते. कोकणे चौकातून नाशिक फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर अगदी वळणावर वाहतूक पोलीस व रहदारी वॉर्डन अगदी धबा धरून बसल्या सारखे उभे असतात. एखादे वाहन आले की लगेच त्याला अडविले जाते. सीट बेल्ट लावला नाही, काळ्या काचा यांसह अनेक कारण सांगत वाहन अडविले जाते. वाहनचालक व पोलिसांमध्ये बाचाबाची प्रकारही नित्याचेच झाले आहेत. कारवाई करायचीच तर सर्वांवर करा, असे वाहनचालक म्हणतात़ अनेक वाहन चालक दंड प्रकरण चिरीमिरीवर मिटण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे ही कारवाई म्हणावी की, दिवसाचा खर्च वसूल असाच प्रश्न अनेकांना सतावत आहे. अशा कामचुकारपणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर व कोणत्याही प्रकारचे अधिकार नसताना वाहन तपासणी करणे, वेळप्रसंगी दंडाच्या पावत्या फाडणाऱ्या वॉर्डनवर संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होईल काय? असा सवाल वाहनचालकांना सतावत आहे. (वार्ताहर)पोलिसांपेक्षा वॉर्डनचीच आरेरावी जास्त वाहतूक पोलीस फक्त चौकाच्या एका कोपऱ्यात उभे राहून दंडाची पावती फाडण्याचे काम करीत असतात. मात्र, रहदारी वॉर्डन वाहन आडवीने, वहान चालविण्याचा परवाना, पीयूसी यांसह इतर कागदपत्रांची तपासणी करणे, वाहन पोलिसांच्या ताब्यात देणे ही मुख्य भूमिका वॉर्डन पार पाडताना दिसून येत आहेत. एखादा वाहनचालक मागितलेले कागदपत्र देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा तुला काय अधिकार आशी विचारणा केल्यास काही वेळा तर वाहनाची चावी काढून घेतली जाते. त्या वाहन चालकाशी वॉर्डन हुज्जत घालतात, असे प्रकार नित्याचे झाले आहेत. एखाद्या वाहनाला किती दंड आकारायचा तेसुद्धा रहदारी वॉर्डनच ठरवित आहेत.