शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाढत्या गृहप्रकल्पांमुळे मूलभूत सुविधांवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 07:17 IST

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया उद्योगनगरीत बांधकामांची संख्याही वेगाने वाढत आहे. महापालिका हद्दीत साडेचार लाखांहून अधिक मालमत्ता आहेत.

पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया उद्योगनगरीत बांधकामांची संख्याही वेगाने वाढत आहे. महापालिका हद्दीत साडेचार लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. गेल्या वर्षापर्यंत महापालिकेने १४९९ बांधकामांना परवानगी दिली. त्यात ३३६ एकरावरील बांधकामांचा समावेश आहे. १ कोटी ४६ लाख चौरस फुटांच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे मूलभूत सुविधांवर ताण येत आहे, असा निष्कर्ष पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून काढला आहे.गाव ते महानगर आणि महानगर ते स्मार्ट सिटी असा प्रगतीचा आलेख सर्वश्रुत आहे. शहराचे क्षेत्रफळ सुमारे १७७.३० चौरस किलोमीटर आहे. शहराची लोकसंख्या सुमारे २१ लाखाच्या घरात आहे. लोकसंख्येचा विचार केल्यास शहर राज्यातील पाचव्या क्रमांकावर आहे. १९८६ च्या विकास आराखड्यानुसार, शहरात ११.८२ टक्के भाग रहिवाशी, ४.९६ टक्के भाग वाहतूक क्षेत्रासाठी, तर ३०.५४ टक्के भाग वनांसाठी आरक्षित आहे. शहराच्या आजूबाजूच्या परिसरात गृहप्रकल्प, औद्योगिक वसाहतींची संख्या वाढली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यातील दुसºया क्रमांकाचा औद्योगिक भाग पिपरी-चिंचवडमध्ये येतो. हिंजवडी आयटी पार्क, तळवडे आयटी पार्क, चाकण एमआयडीसी यामुळे शहरात वास्तव्यास येणाºयांची संख्याही मोठी आहे. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे बांधकाम क्षेत्रात वाढ होत आहे. राज्यातून तसेच परप्रांतातून उद्योग-व्यवसायानिमित्त शहराच्या दिशेने होणारे स्थलांतर यामुळे उद्योगनगरीची लोकसंख्या वाढतच आहे. महापालिका हद्दी लगतची काही गावे समाविष्ट केल्यानंतर शहराचे क्षेत्रफळ वाढले. त्याचबरोबर शेतीचा भाग मोठ्या प्रमाणात शहरात आल्याने रिकाम्या भूखंडांची संख्याही वाढली आहे. अनेकांनी शेतजमिनी एनए(ना-शेती) करून घेतल्या आहेत.रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर वॉटर हिटर कागदोपत्रीबांधकाम परवानगी देताना ३०० चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडासाठी सोलर वॉटर हिटर बसविणे व सांडपाणी पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. याशिवाय २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांना मलशुद्धीकरण केंद्र बांधणे बंधनकारक केले आहे. बांधकाम परवानगी मिळेपर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर वॉटर हिटर बसविण्याचे कागदोपत्री दाखविले जाते. मात्र, परवानगीनंतर संबंधित बिल्डरकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत.