शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

लोकवर्गणीचा समाजासाठी विनियोग करा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:43 IST

गणेशोत्सवासाठी लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीचा उपयोग समाजकार्यासाठी करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी केले.

लोणावळा : गणेशोत्सवासाठी लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीचा उपयोग समाजकार्यासाठी करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी केले.स्वातंत्र्यदिन, दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील पदाधिकारी व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी शिवथरे बोलत होते. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, नायब तहसीलदार आर. एल. कांबळे, मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, वीजवितरणचे उप कार्यकारी अभियंता मुकुंद तेलके उपस्थित होते.लोणावळ्यातील गणेश विसर्जन मार्गावरील लोंबलेल्या विजेच्या तारा वीजवितरण कंपनीने अनंत चतुर्थीपूर्वी काढून घ्याव्यात. गणेश विसर्जनासाठी टाटा कंपनीने इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी शहराध्यक्षा जाधव यांनी केली. शहरात नवीन भुयारी गटार योजना राबवून नदीपात्रात सोडले जाणारे ड्रेनेज बंद करत नदीपात्र स्वच्छ व सुंदर केले जाणार आहे. याकरिता प्रकल्प सल्लागार नेमण्यात आला आहे. गणेशोत्सवापूर्वी तुंगार्ली गावाच्या रस्त्याची डागडुजी केली जाईल. पावसाळा संपताच नांगरगाव येथील स्वामी समर्थ मठाच्या बाजूचा रस्ता बनविणे व इंद्रायणी नदीच्या पुलाचे रुंदीकरण ही कामे सुरू करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.नायब तहसीलदार कांबळे म्हणाले, सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. वीजवितरणचे अधिकारी तेलके यांनी गणेश उत्सवात दहा दिवस शहरात कोठेही वीज बंदचे विघ्न येणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊ, असे आश्वासन देताना गणेश मंडळांना एका दिवसात वीज कनेक्शन देऊ असे सांगितले. मुख्याधिकारी सचिन पवार म्हणाले, गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे बाजूला काढत मार्ग मिरवणुकीसाठी मोकळा करणे, नदीपात्रावर व मार्गावर पुरेशी वीज व्यवस्था, दक्षता पथक, आप्तकालीन पथक, रस्ते दुरुस्ती ही सर्व कामे पूर्ण केली जातील. तसेच पोलिसांच्या सूचनांप्रमाणे इंद्रायणी नदीकाठच्या गार्डनमध्ये विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार करणार आहोत.गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दरवर्षी भेडसावणाºया प्रश्नांची आठवण अधिकाºयांना करून दिली.शिस्तबद्ध मंडळांना रोख बक्षिसेगणेश उत्सव काळात बाप्पाच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत नियमांचे पालन करून आदर्शवत गणेश उत्सव साजरा करणाºया शिस्तबद्ध मंडळांना अनुक्रमे दहा, साडेसात व पाच हजार रुपयांची रोख बक्षिसे कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी सांगितले़सीसीटीव्ही बसवा : मंडळांना सूचनापोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी गणेश मंडळांना सुरक्षेबाबत सूचना देताना सर्व गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली. ांडळांनी धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारणे, ध्वनिप्रदूषण होणार नाही यांची दक्षता घेत स्पिकरचा आवाज ठेवावा़ डिजे व डॉल्बीला बंदी असल्याने कोणी डिजे-डॉल्बीचा वापर करू नये, गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा न करता लहान मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, विसर्जन मिरवणुकीत चांगली सुस्थितीमधील वाहने वापरावीत, मानाच्या गणेश मंडळांनी रांगेतील इतर मंडळांचे बाप्पा देखील रात्री बारापूर्वी विसर्जित होतील याची खबरदारी घ्यावी़ स्वयंसेवकांना ओळखपत्र द्यावीत, मूर्तीची सर्वतोपरी काळजी घ्यावी, मिरवणुकीत गुलाल उधळू नये व उधळल्यास दुसºयाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत.डीजे लावणाऱ्यांवर फौजदारीलोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : या वर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त व गणेश मंडप परिसरात रात्रीचा चालणारा जुगारमुक्त करणार आहे. मंडळांनी डीजे सिस्टीमवाल्यांना सुपारी दिली असेल, तर ती रद्द करावी अन्यथा संबंधित मंडळांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी खडसावून सांगितले. कामशेत पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळ पदाधिकाºयांची बैठक गुरुवारी झाली. ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी डीजे, डॉल्बी सिस्टीमचा वापर करू नये. मंडळांनी ठाण्यात पदाधिकाºयांची नावे नोंदणी केल्यानंतरच ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र देतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी आय. एस. पाटील यांनी दिली. अधिकाºयांनी गणेशोत्सवादरम्यान घ्यावयाची काळजी व उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले.ठाण्याच्या हद्दीत कामशेत शहरासह ४३ गावे असून, २१ ग्रुप ग्रामपंचायती आहेत. ७५ गणेशोत्सव मंडळे आहेत. कामशेतमध्ये १५ तर इतर गावांत ६० सार्वजनिक गणपती मंडळे आहेत. ग्रामीण भागातील २२ गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना पूर्वापार चालत आली आहे. कामशेत शहरात पाच दिवसांनी विसर्जित होणारे चार गणपती, सात दिवसांनी विसर्जित होणारे दोन गणपती व दहा दिवसांनी विसर्जित होणारे नऊ गणपती आहेत.दहीहंडी, गणपती व बकरी ईद उत्सव काळात कायद्याविरोधात वर्तन झाल्यास संबंधित मंडळ पदाधिकाºयांना जबाबदार धरले जाऊन कडक कारवाई केली जाईल.गणेश विसर्जनाची शेवटची वेळ रात्री १०ची मंडळांनी पाळावी. विसर्जनाच्या वेळी गणेशमूर्ती ठेवण्यात येणाºया गाडीची तपासणी करून घ्यावी. मंडप वाहतुकीस अडथळा ठरणार नाही याची काळजी घ्या. भारनियमन काळात मंडपात पर्यायी व्यवस्था ठेवावी. आदी सूचना शिवथरे यांनी केल्या.ग्रामपंचायत प्रशासनाला विसर्जन घाटावर लाईटची सोय करावी, विसर्जन घाटाची दुरुस्ती करून घ्यावी. विसर्जनासाठी उत्तम पोहणाºया ठरावीक स्वयंसेवकांना ठेवावे. गणेशोत्सव संपेपर्यंत पोलीस पाटलांनी गाव सोडून जाऊ नये. गणेश विसर्जन शांततेत होईल, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले.सरपंच सारिका शिंदे, सदस्या सारिका घोलप, पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस पाटील रोहिदास शिंदे, शंकर शिंदे, तानाजी दाभाडे, वसंत काळे, संतोष काळे, रमेश कदम, प्रकाश गायकवाड, रोहिदास वाळुंज, विकास गायकवाड, प्रतीक टाटिया, महेंद्र भाटी आदी उपस्थित होते. संतोष घोलप यांनी आभार मानले.