शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बेरोजगारी हे देशासमोरील आव्हान - प्रफुल्ल पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:03 IST

प्रफुल्ल पवार : चºहोलीत उद्योजकता विषयावर परिषद

पिंपरी : आज व्यवस्थापन शिक्षणासाठी सात लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र त्यांपैकी ५ टक्के कुशल विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते. आज विद्यार्थी शिक्षणाला कौशल्याची जोड देत नसल्याने ९५ टक्के विद्यार्थी बेरोजगार राहतात. बेरोजगारी हे देशासमोरील मोठे आव्हान बनले आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निबंधक व वाणिज्य व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले.चºहोली येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल आॅफ मॅनेजमेंट, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित उत्कर्ष-व्यावसायिक शिक्षण व बांधणी, कौशल्य, नावीन्यपूर्ण व उद्योजकता या विषयावर आयोजित परिषदेचे आयोजन केले होते. या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

डॉ. कुलदीप चरक, डॉ. रुद्र रामेश्वर, डॉ. बी. के. गुप्ता, डॉ. विनय कांडपाल, उद्योजक केतन गांधी, डॉ. रंजन, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, कॉर्पोरेट रिलेशन्स संचालक डॉ. कमलजित कौर उपस्थित होते.पवार म्हणाले, ‘‘१.३ हजार कोटी युवक रोजगार मिळवण्यासाठी आज धडपड करीत आहे. मात्र रोजगार मिळत नाही. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अनुमानानुसार २०२० पर्यंत सव्वाकोटी बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.’’

डॉ. खेडकर म्हणाले, ‘‘देशात ५४ टक्के तरुणांची संख्या आहे. देशातील तरुणांनी नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे. तरुणांचा विकास म्हणजेच देशाचा विकास होय. व्यावसायिक शिक्षण घेताना कार्यक्षमता व कौशल्ये आत्मसात केल्यावर हा विकास जेव्हा होईल. देशात परिवर्तन घडून आणण्याचे सामर्थ्य तरुणांमध्ये आहे. तरुणांनी व्यावसायिक शिक्षण घेताना नेतृत्वगुण, संभाषणकला, समस्या निवारण, कलाकृती, क्रिटिकल थिंकिंग, माहिती-तंत्रज्ञान, निरीक्षणशक्ती हे गुण आत्मसात केले पाहिजेत.’’डॉ. श्रीकला बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चेतन खेडकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड