शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

अवांतर वाचनातून ‘फिटे अंधाराचे जाळे’, अंध विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 06:25 IST

वाचन माणसाला प्रगल्भ बनवते. ‘वाचाल तर वाचाल’ अशी म्हण आहे. मात्र यासाठी पाठ्यपुस्तकातील धड्यांबरोबरच अवांतर वाचनही महत्त्वाचे असते. अंध विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी रुजवण्यासाठी भोसरी येथील पताशीबाई रतनचंद लुंकड अंध शाळेमध्ये ब्रेल लिपीतील साहित्य वाचनासाठी स्वतंत्र तास सुरु करण्यात आला आहे.

- नितीन शिंदेभोसरी  - वाचन माणसाला प्रगल्भ बनवते. ‘वाचाल तर वाचाल’ अशी म्हण आहे. मात्र यासाठी पाठ्यपुस्तकातील धड्यांबरोबरच अवांतर वाचनही महत्त्वाचे असते. अंध विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी रुजवण्यासाठी भोसरी येथील पताशीबाई रतनचंद लुंकड अंध शाळेमध्ये ब्रेल लिपीतील साहित्य वाचनासाठी स्वतंत्र तास सुरु करण्यात आला आहे. अवांतर वाचनाकडे डोळेझाक करणाºया ‘डोळस’ विद्यार्थ्यांसाठीही हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे.भोसरी, पांजरपोळ येथील पताशीबाई रतनचंद लुंकड अंध शाळेत पहिली ते आठवीच्या वर्गात ७२ अंध विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत १९९५ पासून ग्रंथालय सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या काळात सर्वसाधारण पुस्तके या ठिकाणी उपलब्ध होती. मात्र, कालांतराने नॅशनल असोसिएशन आॅफ ब्लाइंड (नॅब) संस्थेकडून ब्रेल लिपीतील साहित्यसंपदा उपलब्ध होऊ लागली आहे. ब्रेल लिपीतील विविध लेखकांची सुमारे ५०० पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. मात्र, पाठ्यपुस्तकाखेरीज अवांतर वाचनाकडे कल कमी असतो. त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यातून त्यांची प्रगल्भता वाढावी यासाठी दररोज चाळीस मिनिटांचा अवांतर वाचन वर्ग शाळेमध्ये सुरु केला आहे. २० जानेवारी २०१८ पासून या उपक्रमाला सुरुवात झाली.वाचताना विद्यार्थ्यांना काही शंका आल्यास शिक्षकांमार्फत त्यांचे निरसन केले जाते. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढत आहे. काही मुलांना वाचनाची गोडी असली, तरी ही मुले स्वत: ब्रेल लिपीतील पुस्तके न वाचता इतर डोळस व्यक्तींकडून सर्वसाधारण पुस्तके वाचून घेतात. परिणामी ही मुले ब्रेल लिपीत उपलब्ध असलेल्या ग्रंथसंपदेपासून दुरावत असल्याचे चित्र आहे. स्वत: पुस्तक वाचल्यास ग्रहणशक्ती वाढते. त्यामुळे वाचनाचा तासच सुरू केल्याचे मुख्याध्यापक पांडुरंग साळुंके यांनी सांगितले.सुटीतही वाचनवर्गप्रत्येक वर्गामध्ये मुले एकेक पुस्तक घेऊन त्याचे वाचन करतात. मुलांनी कुठले पुस्तक घेतले, ४० मिनिटांमध्ये त्यांची किती पाने वाचून झाली. त्यांनी पुस्तक पूर्णपणे वाचले का, या सर्व बाबींचे रेकॉर्ड शाळेकडून ठेवले जाते. शाळा वाचनाची नोंद ठेवत असल्याने मुलांपुढे पुस्तक पूर्ण वाचून काढण्याखेरीज पर्याय राहत नाही. सोमवार ते शुक्रवार सायंकाळच्या वेळेत तर शनिवारी व रविवारी सुटी असल्याने दुपारच्या वेळेत वाचन वर्ग घेतला जातो.शाळांसाठीही पथदर्शीमोबाइल, इंटरनेटच्या अतिवापरामुळे डोळस मुलांमधील अवांतर वाचनाची गोडी कमी झाली आहे. ग्रहण, आकलन शक्तीबरोबरच प्रगल्भता वाढीसाठी अवांतर वाचन गरजेचे असते. मात्र, आजकालची मुले वाचनापासून दुरावत चालल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत पताशीबाई लुंकड शाळेत वाचन वर्ग सुरू करत एखाद्या विषयाच्या तासाप्रमाणे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अंध मुलांमध्ये अवांतर वाचनाची गोडी वाढत आहे. हा उपक्रम सर्वसाधारण शाळांसाठी पथदर्शी ठरत आहे.