शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

‘अनधिकृत’बाबत प्रशासन अनभिज्ञ, केवळ १५ टक्के बांधकामे नियमित होण्याची शक्यता  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:01 IST

अवैध बांधकामे नियमितीकरणाचा कायदा जाचक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर साशंक आहेत. या कायद्यामुळे शहरातील केवळ १५ टक्के घरे नियमित होतील,

पिंपरी : अवैध बांधकामे नियमितीकरणाचा कायदा जाचक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर साशंक आहेत. या कायद्यामुळे शहरातील केवळ १५ टक्के घरे नियमित होतील, अशी शक्यता पालिका प्रशासनाने वर्तविलीआहे, अशी माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे व संघटक सुलभा उबाळे यांनी दिली. तसेच बांधकामे नियमित झाल्यावर शास्तीकर माफ होईल का, याबाबत प्रशासन संभ्रमात असल्याचेही त्यांनी सांगितले.आता राज्य सरकारने अवैध बांधकामे नियमितीकरणाचा केलेला कायदा जाचक आहे. दुप्पट पैसे भरून नागरिकांना घरे अधिकृत करावी लागणार आहेत. तसेच याचा केवळ १५ टक्के लोकांनाच फायदा होणार आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी शिवसेनेने मोठा पाठपुरावा केला आहे. अनेक आंदोलने केली. विधानभवनावर मोठ-मोठे मोर्चे काढले आहेत. परंतु, आता फलक लावणारे त्या वेळी कोठेच नव्हते. श्रेयवादासाठी चार वेळा फलक लावले गेले आहेत. नियमित बांधकामे केलेल्या नागरिकांना एफएसआय वाढवून दिला पाहिजे. आम्ही परवानगीघेऊन नियमित बांधकामे करूनचूक केली आहे का?, नियमित कर भरतो ही आमची चूक आहे का, असा प्रश्न नियमित बांधकाम करणारे नागरिक विचारत आहेत. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ नये. सर्वांना समान न्याय असला पाहिजे. यासाठी नियमित बांधकामे केलेल्या नागरिकांना एफएसआय वाढवून दिला पाहिजे.’’आता फलक लावणारे त्या वेळी कोठे होते?अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शिवसेनेने लढा दिला. आंदोलने केली होती. आता फलक लावणारे त्या वेळी कोठे होते, असा सवालही उबाळे यांनी उपस्थित केला आहे. ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार महापालिकेने नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.याबाबत बोलताना कलाटे व उबाळे म्हणाल्या, ‘‘शहरात केवळ ६६ हजार अवैध बांधकामे असल्याचा आकडा प्रशासनाकडे आहे. परंतु, तो कमी आहे. शहरात यापेक्षा अधिक अवैध बांधकामे आहेत. या कायद्यानुसार अत्यल्प बांधकामे नियमित होतील. जी नियमित होतील, त्यांना जबर दंड अदा करावा लागेल. यापेक्षा गुंठेवारीचा कायदा चांगला होता. त्याचा १० टक्के नागरिकांना फायदा झाला होता, असे कलाटे म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड