शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मुंबई-पुणे रस्त्यावरील संघवी क्रेनजवळ भीषण अपघात; २ ठार, ५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 13:37 IST

मुंबई-पुणे रस्त्यावर विनोदेवाडी (साते) संघवी क्रेनजवळ  कंटेनर आणि डस्टर या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (बुधवार, दि. १०) सकाळी ६च्या दरम्यान हा अपघात झाला.

ठळक मुद्देदोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी रुग्णवाहिकेच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात करण्यात आले दाखल

वडगाव मावळ : मुंबई-पुणे रस्त्यावर विनोदेवाडी (साते) संघवी क्रेनजवळ कंटेनर आणि डस्टर या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (बुधवार, दि. १०) सकाळी ६च्या दरम्यान हा अपघात झाला.राकेश दक्षणामूर्ती नायडू (वय २५, रा.  एनडीए, मनीषा थिएटर मागे, शिवणे, पुणे) राहुल दत्तात्रय नागरगोजे (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा, मूळ रा. दवणगाव, ता. रेणापूर, जि. लातूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. राजेंद्र चांगोत्रे (वय २३, रा. एनडीए, खडकवासला), दिपांशू भारद्वाज (वय २५, रा. वाकड), अमनसिंह (वय २३, रा. लवासा, पुणे), रविकुमार प्रेमसिंग (वय २४, रा. वारजे), कंटेनर चालक लालचंद्र यादव (रा. उत्तर प्रदेश) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम एच १४ एफ एम ७२६१ क्रमांकाच्या कारमधून राहुल नागरगोजे, राकेश नायडू, राजेंद्र चांगोत्रे, दिपांशू भारद्वाज, अमनसिंह,  रविकुमार प्रेमसिंग हे पुणे बाजूला सुसाट निघाले असताना त्यांच्या कारचे नियंत्रण सुटल्याने पुणे बाजूला जाणाऱ्या एम एच ४३ इ ६५८६ कंटेनरला पाठीमागून जोरात धडक बसली. या अपघातात राकेश नायडू व राहुल नागरगोजे यांचा जागीच मृत्यू झाला तर यात कारमधील चौघांसह कंटेनर चालक जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींना वडगाव पोलीस व रुग्णवाहिका चालक मिलिंद नवाडे यांनी जखमींना वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. अपघाताचा तपास पोलीस हवालदार राजेश कर्डिले करत आहे.

धोकादायक वळणविनोदेवाडी हद्दीत संघवी क्रेनजवळ धोकादायक वळण असल्याने त्या ठिकाणी वारंवार अपघात होऊन बळीच्या संख्येत वाढ होत आहे. १ ते १० जानेवारी दरम्यान तीन भीषण अपघात झाले यात ४ जण मृत्यूमुखी पडले तर ८ जण जखमी झाले होते. या धोकादायक वळणाबाबत आयआरबी तात्पुरती दुरुस्ती करत असून सध्या महामार्गावरील दुभाजक दुरुस्तीच्या नावावर काढून टाकले असून सुसाट वाहने अचानक एकामार्गावरून दुसऱ्या मार्गावर आल्याने अपघात होत आहे. वडगाव येथील सेवा रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

महामार्गाच्या बळींना जबाबदार कोण? आयआरबी महामार्गावर टोल वसुलीचे काम करत असून महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड