शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जुळ्या मुलींच्या जन्मदात्रीची झुंज; पाषाणहृदयी पित्याने फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:39 IST

एकमेकांना जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका घेऊन प्रेमविवाह केला. जुळ्या मुलींना जन्म दिला म्हणून ‘‘तू आणि तुझ्या मुली, माझा यापुढे तुझ्याशी काही संबंध राहणार नाही,’’ असे सांगून विवाहाची वर्षपूर्ती होण्याआगोदरच पत्नीला एकाकी सोडून दिले आहे.

पिंपरी : एकमेकांना जीवनभर साथ देण्याच्या आणाभाका घेऊन प्रेमविवाह केला. जुळ्या मुलींना जन्म दिला म्हणून ‘‘तू आणि तुझ्या मुली, माझा यापुढे तुझ्याशी काही संबंध राहणार नाही,’’ असे सांगून विवाहाची वर्षपूर्ती होण्याआगोदरच पत्नीला एकाकी सोडून दिले आहे. जन्मदात्या पित्याला मुली नकोशा झाल्या, मात्र जन्मदात्रीचा त्या मुलींचा जीव वाचविण्याची धडपड. त्या मातेने मुलींना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, मृत्यूशी झुंज देत असलेले जुळ््यातील एक बाळ बाराव्या दिवशी सोमवारी सायंकाळी दगावले. मुलींच्या जन्माने संकटात सापडलेली माता एक बाळ दगावल्याने आणखी विवंचनेत पडली आहे.नऊ महिने पूर्ण होण्याआगोदरच प्रसूती झाल्याने जुळ्या मुलींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा जन्मदाता पिता पंजाबमध्ये, त्याला मुली नकोशा झालेल्या, परंतु जन्मदात्रीची मुलींना वाचविण्याची धडपड सुरू होती. तिने पैशांची जमवाजमव करून बाळांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या जन्माने संकटात सापडलेली माता एक बाळ दगावल्याने आणखी विवंचनेत पडली आहे. पतीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. प्रसूतीला अवघे दहा दिवस झालेले, त्यात एक बाळ दगावले, निदान दुसरे बाळ तरी वाचविणे शक्य होईल, यासाठी तिची धडपड सुरू आहे.आयुष्याची साथ देणाºयाने टाकले संकटातपोलिसांकडे तक्रार तरी काय द्यायची. तक्रार द्यायला बाहेर पडता येत नाही. आर्थिक संकट आहेच, त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच विश्वासघात केला. आता मदत तरी कोणाकडे मागायची, अशी केविलवाणी अवस्था जुळ्या मुलींना जन्म देणाºया मातेची झाली आहे. आयुष्यभर साथ देण्याचे वचन देणाºयाने संकटात एकटीला सोडले. त्या संकटाशी तिची एकाकी झुंज सुरू आहे. वयोवृद्ध माता, पिता मुलीवर ओढवलेल्या संकटावर मात करण्यासाठी तिला साथ देत आहेत. घरात तिन्ही मुली, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची, वडील धार्मिक विधी व पूजापाठ करून मिळेल त्या पैशांवर चरितार्थ चालवितात. तर आई स्वयंपाकाचे काम करते. लग्न होऊन मुली बाहेर गेल्या, आता त्यांनाही कोणाचा आधार नाही, आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड देत मुलीला सावरण्याची त्यांचीही केविलवाणी धडपड सुरू आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड