शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

बावीस कोटी खर्चूनही कोंडी, डांगे चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे श्वास कोंढलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:02 IST

डांगे चौकात नित्याची होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सुमारे रुपये २२ कोटी खर्च करून औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर दुहेरी (स्क्लिट) पूल उभारण्यात आला. पाच वर्षांपूर्वी उभारण्यात या पुलामुळे या चौकातील वाहतूककोंडी सुटली का, हा संशोधनाचा विषय आहे.

रहाटणी : डांगे चौकात नित्याची होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सुमारे रुपये २२ कोटी खर्च करून औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर दुहेरी (स्क्लिट) पूल उभारण्यात आला. पाच वर्षांपूर्वी उभारण्यात या पुलामुळे या चौकातील वाहतूककोंडी सुटली का, हा संशोधनाचा विषय आहे. चौकात वाढलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे डांगे चौकाचा श्वास गुदमरत असून, वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस किचकट होत आहे.या चौकातून पिंपरी-चिंचवड शहरातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाºया-येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उड्डाणपुलाचा फायदा वाहतुकीस झाला नसल्याने या चौकातील वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. या चौकात रस्त्याच्या दुतर्फा बसणाºया हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांनी रस्ता गिळंकृत केल्याने या अडचणीत आणखीच भर पडली आहे. या समस्यकडे पालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस डोळेझाक करीत असल्याचा आरोप वाहनचालक करीत आहेत. या चौकात मजूरअड्डा असल्याने अगदी सकाळी चौकात मोठ्या प्रमाणात मजूर उभे असतात. त्यामुळे चहावाले, नाश्तावाले, फळविक्रेते यांच्या इतर व्यवसायाच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर लागत असल्याने पादचाºयांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे. डांगे चौकाकडून हिंजवडीकडे जाणाºया रस्त्यावर सहा सीटर रिक्षा, तीन सीटर रिक्षा व हातगाडीवाले, फेरीवाले यांनी सर्वच रस्ता काबीज केल्याने तीन पदरी असूनही वाहनचालकांना रस्ता शोधावा लागत आहे. हीच बाब हिंजवडीकडून डांगे चौकाकडे येणाºया रस्त्याची झाली आहे. वाहनचालकांना रस्ताच मोकळा मिळत नसल्याने चौकात वाहनांच्या रांगाच रांगा लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.दुकानदारांचा डबल धंदारोजच होणाºया वाहतूककोंडीला अंकुश लागावा, म्हणून शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले. यासाठी अनेक मिळकतधारकांनी जमिनी दिल्या. त्यामुळे रस्ते मोठे झाले मात्र वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला नाही. दुकानाच्या समोर जागा हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांच्याकडून ठरावीक रक्कम घेऊन भाड्याने दिली आहे. त्यामुळे दुकानासमोरील फुटपाथ व रस्ता शिल्लकच राहिला नाही, तसेच तीन लेनमधील एक लेन हेच व्यावसायिक वापरात आहेत, तर दुसरी लेन सहा व तीन आसनी रिक्षावाल्यांनी काबीज केल्याने चालकांना रस्ताच शिल्लक राहत नाही. त्यामुळे या चौकाच्या चारही दिशांना अपघाताचे प्रमाण वाढले आहे.पुलाचा फायदा कोणाला?सुमारे पाच वर्षांपूर्वी २२ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा फायदा नक्की कोणाला, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. या पुलाची लांबी ८५०० मीटर, तर रुंदी आठ मीटर असून, यासाठी २८ कॉलम उभारण्यात आले आहेत. मात्र पुलाचा खरेच वाहतूककोंडी सोडविण्यासाठी फायदा झालाय काय हा खरा प्रश्न आहे. कारण या पुलावरून तुरळक प्रमाणात वाहने ये-जा करताना दिसून येतात. मात्र, मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवड ते हिंजवडी ते पिंपरी-चिंचवड या मार्गावर दिवसभर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. त्यामुळे हा पूल म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.