शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बावीस कोटी खर्चूनही कोंडी, डांगे चौक रस्त्यावरील अतिक्रमणामुळे श्वास कोंढलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:02 IST

डांगे चौकात नित्याची होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सुमारे रुपये २२ कोटी खर्च करून औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर दुहेरी (स्क्लिट) पूल उभारण्यात आला. पाच वर्षांपूर्वी उभारण्यात या पुलामुळे या चौकातील वाहतूककोंडी सुटली का, हा संशोधनाचा विषय आहे.

रहाटणी : डांगे चौकात नित्याची होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सुमारे रुपये २२ कोटी खर्च करून औंध ते रावेत बीआरटी रस्त्यावर दुहेरी (स्क्लिट) पूल उभारण्यात आला. पाच वर्षांपूर्वी उभारण्यात या पुलामुळे या चौकातील वाहतूककोंडी सुटली का, हा संशोधनाचा विषय आहे. चौकात वाढलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे डांगे चौकाचा श्वास गुदमरत असून, वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस किचकट होत आहे.या चौकातून पिंपरी-चिंचवड शहरातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाºया-येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या उड्डाणपुलाचा फायदा वाहतुकीस झाला नसल्याने या चौकातील वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. या चौकात रस्त्याच्या दुतर्फा बसणाºया हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांनी रस्ता गिळंकृत केल्याने या अडचणीत आणखीच भर पडली आहे. या समस्यकडे पालिका प्रशासनाचा अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस डोळेझाक करीत असल्याचा आरोप वाहनचालक करीत आहेत. या चौकात मजूरअड्डा असल्याने अगदी सकाळी चौकात मोठ्या प्रमाणात मजूर उभे असतात. त्यामुळे चहावाले, नाश्तावाले, फळविक्रेते यांच्या इतर व्यवसायाच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर लागत असल्याने पादचाºयांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे. डांगे चौकाकडून हिंजवडीकडे जाणाºया रस्त्यावर सहा सीटर रिक्षा, तीन सीटर रिक्षा व हातगाडीवाले, फेरीवाले यांनी सर्वच रस्ता काबीज केल्याने तीन पदरी असूनही वाहनचालकांना रस्ता शोधावा लागत आहे. हीच बाब हिंजवडीकडून डांगे चौकाकडे येणाºया रस्त्याची झाली आहे. वाहनचालकांना रस्ताच मोकळा मिळत नसल्याने चौकात वाहनांच्या रांगाच रांगा लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.दुकानदारांचा डबल धंदारोजच होणाºया वाहतूककोंडीला अंकुश लागावा, म्हणून शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले. यासाठी अनेक मिळकतधारकांनी जमिनी दिल्या. त्यामुळे रस्ते मोठे झाले मात्र वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला नाही. दुकानाच्या समोर जागा हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांच्याकडून ठरावीक रक्कम घेऊन भाड्याने दिली आहे. त्यामुळे दुकानासमोरील फुटपाथ व रस्ता शिल्लकच राहिला नाही, तसेच तीन लेनमधील एक लेन हेच व्यावसायिक वापरात आहेत, तर दुसरी लेन सहा व तीन आसनी रिक्षावाल्यांनी काबीज केल्याने चालकांना रस्ताच शिल्लक राहत नाही. त्यामुळे या चौकाच्या चारही दिशांना अपघाताचे प्रमाण वाढले आहे.पुलाचा फायदा कोणाला?सुमारे पाच वर्षांपूर्वी २२ कोटी रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा फायदा नक्की कोणाला, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. या पुलाची लांबी ८५०० मीटर, तर रुंदी आठ मीटर असून, यासाठी २८ कॉलम उभारण्यात आले आहेत. मात्र पुलाचा खरेच वाहतूककोंडी सोडविण्यासाठी फायदा झालाय काय हा खरा प्रश्न आहे. कारण या पुलावरून तुरळक प्रमाणात वाहने ये-जा करताना दिसून येतात. मात्र, मोठ्या प्रमाणात पिंपरी-चिंचवड ते हिंजवडी ते पिंपरी-चिंचवड या मार्गावर दिवसभर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. त्यामुळे हा पूल म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.