शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनातील मृतांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:56 IST

पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनाला सहा वर्षे पूर्ण होत असून, शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी १० वाजता बौर एक्स्प्रेस हायवेपासून ज्योत पेटवून श्रद्धांजली स्थळी आणली.

येळसे : पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनाला सहा वर्षे पूर्ण होत असून, शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी १० वाजता बौर एक्स्प्रेस हायवेपासून ज्योत पेटवून श्रद्धांजली स्थळी आणली. येळसे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात तीन शहीद कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्यामराव तुपे यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी मावळ तालुक्याचे आमदार संजय तथा बाळा भेगडे, आमदार दिगंबर भेगडे, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकर शेलार, एकनाथ टिळे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, बंद जलवाहिनी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम ,भास्कर म्हाळसकर, पांडुरंग ठाकर, प्रशांत ढोरे, राजू खाडभोर, भारत ठाकूर, रवींद्र भेगडे, अलका धानिवळे, रघुवीर शेलार, अजित अगळे, बाळासाहेब जाधव, गुलाब वरघडे, जिजाबाई पोटफोडे, निकिता घोटकुले, सुरेखा जाधव, संदीप भुतडा, बबनराव कालेकर, शंकर लोखंडे, अंकुश पडवळ, किसन घरदाळे, अनिल तुपे, किसन खैरे, अमित कुंभार, गणेश ठाकर, श्यामराव शिंदे, मुकुंद ठाकर, नवनाथ ठाकर, रमेश आडकर, लक्ष्मण भालेराव, सचिन मोहिते, अनिल साबळे, गणेश गावडे, वंसत काळे, नंदू कालेकर, सचिन साबळे व हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी शेतकºयांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भांत सकारात्मक निर्णय घेऊन खटले मागे घेण्यात येतील, असे आश्वासन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिले.या वेळी पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी म्हणाले, पवना बंद जलवाहिनी ज्या वेळी कायमची रद्द झाल्याची घोषणा होईल त्या वेळी खºया अर्थाने अंदोलनादरम्यान शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होईल. या वेळी प्रस्ताविक श्री. पांडुरंग ठाकर यांनी केले व सूत्रसंचालन विश्वनाथ जाधव यांनी केले.या वेळी तळेगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.बंदिस्त जलवाहिनीला याआधीही आमचा विरोध कायम होता व यापुढे ही बंद जलवाहिनीला विरोध कायम राहिल. काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून बंद जलवाहिनीचा प्रकल्प कायमचा रद्द करण्याची मागणी शिष्टमंडळाला घेऊन करण्यात येईल. शेतकऱ्यांना तत्कालीन शासनाने नोंदविण्यात आलेले गुन्हे लवकरच मागे घेण्यात येतील.- बाळा भेगडे, आमदार