शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्णकर्कश हॉर्न होणार शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:14 IST

 पुणे : कर्णकर्कश आवाज करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाºया वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. असा दचकवणारा आवाज करणाºया या वाहनांवर भरारी पथकामार्फत कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिले आहेत.अनेक वाहनचालक अगदी शंभर सीसीपासून, दीडशे, अडीचशे आणि साडेतीनशे सीसींच्या गाड्यांमध्ये देखील ...

 पुणे : कर्णकर्कश आवाज करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाºया वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. असा दचकवणारा आवाज करणाºया या वाहनांवर भरारी पथकामार्फत कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिले आहेत.अनेक वाहनचालक अगदी शंभर सीसीपासून, दीडशे, अडीचशे आणि साडेतीनशे सीसींच्या गाड्यांमध्ये देखील बदल करून आवाज अधिक ‘कडक’ करून घेतात. काही महाभाग तर एखाद्याला दचकावून सोडेल, असा हॉर्न अथवा सायलेन्सरचा आवाज करताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी अगदी डोक्यात झिणझिण्या आणणारा हॉर्न बसविण्याची लाट होती. हा खास आवाज ‘डुक्कर हॉर्न’ म्हणून प्रसिद्ध होता.आता सायलेन्सरचा मध्येच फट् असा जोराचा आवाज होईल, असा बदल केला जात आहे. काही जण धडधड... फट्... फट् अशा आवाजाला आणखी धार देतआहेत. काही गाड्यांत तर सामान्य आवाज आणि कर्णकर्कश आवाजासाठीदेखील स्वतंत्र कळ असते. त्यामुळे गाडीचालक हवेतेव्हा असा आवाज काढूशकतो. त्यामुळेदेखील अशा वाहनचालकांना पकडण्याचे आव्हान आरटीओसमोर आहे.लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी याबाबत आरटीओकडे तक्रार केली होती.तसेच याबाबतच्या अनेक तक्रारीदेखील आरटीओकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी आजरी यांनीअशा वाहनांवर भरारी पथकामार्फत कारवाई करण्याचे आदेशदिले असून, त्याचा अहवालखटला विभागामार्फत पाठविण्याची सूचना केली आहे.आवाजाच्या शुल्कापोटी ७२ लाखांची वसुली७२ लाख : सायलेन्सर अथवा हॉर्नद्वारे कर्णकर्कश आवाज काढत गाडी दामटणाºयांना गेल्या पाच वर्षांत तब्बल ७२ लाख रुपयांचे शुल्क ‘आवाजा’पोटी भरावे लागले असल्याकडे लोकमतने लक्ष वेधले होते.सहा वर्षांत ६ हजार ८२० वाहने दोषी : गेल्या सहा वर्षांत केलेल्या कारवाईत ६ हजार ८२० वाहने दोषी आढळली असून, त्यातील ६ हजार ५५१ वाहनांकडून ६१ लाख २२,२०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.१० लाख ८० हजार १०० रुपये दंड : गेल्या सहा वर्षांत ३ हजार १८ वाहनांकडून वाहतूक पोलीस शाखेने वसूल केला आहे.दंड वसुल करताना या आवाजाची सुरुवात नक्की कोठून होते, हे शोधण्याचा साधा प्रयत्नदेखील आरटीओ अथवा पोलिसांनी केला नसल्याचे देखील या वृत्तात (१२ जुलै रोजी प्रसिद्ध) लक्ष वेधण्यात आले होते.कर्कश सायलेन्सरवर कारवाई कधी ?सायलेन्सरमध्ये बदल करून देणारे अथवा कर्कश हॉर्न बसवून देणाºयांवरदेखील कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने पुढे येत आहे. आरटीओ अथवा पोलीस विभाग आपल्या कामाचा एक भाग म्हणून वर्षाला कर्णकर्कश वाहनांवर कारवाई करतात. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंडदेखील वसूल केला जातो. मात्र, हा प्रकार थांबवायचा असेल, तर असा बदल करून देणाºयांवरदेखील कडक कारवाई झाली पाहिजे. मात्र, तया प्रयत्न होताना दिसत नाही.