शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आयुक्त बंगल्यासमोरील दुभाजकातील झाडे जळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 15:46 IST

महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे बकुळीचं झाड जळालं ग, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

ठळक मुद्देराज्य शासनाचा ३३ लाख झाडे लावण्याचा संकल्प : अशास्त्रोक्त पद्धतीने केली लागवड : ९१ पैकी १९ झाडे मरणासन्न; उद्यान विभागाचा गलथानपणा

- नारायण बडगुजर  पिंपरी : मोरवाडीतील आयटीआयला लागून महापालिका आयुक्त बंगला ते न्यायालयाच्या ९०० मीटर अंतराच्या रस्ता दुभाजकात बकुळीची ९१ झाडे लावली होती. ही झाडे अशास्त्रीय पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी लागवड केल्याने १९ झाडे जळाली आहेत. बकुळीचं झाड झरलं ग, फुलांनी अंगण भरलं गं... असे वर्णन आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांनी केले होते, मात्र, महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे बकुळीचं झाड जळालं ग, असे म्हणण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने ३३ लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात विविध शासकीय, निमशासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सहभाग घेतला आहे. त्याअंतर्गत महापालिकेकडूनही शहरात दीड लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मात्र, लागवड केलेल्या वृक्षसंवर्धनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. आयुक्तांच्या निवासस्थाना समोरील रस्ता मोरवाडी न्यायालय चौकात येतो. न्यायालयापासून आयुक्तांचा बंगला नऊशे मीटर अंतरावर आहे. या रस्त्याचे सुशोभीकरण केले आहेत. दुभाजकात बकुळीची ९१ झाडे लावली होती. मात्र, १९ झाडे जळाली आहेत. या वृक्षांची पाहणी लोकमतने केली. त्यावेळी अरुंद दुभाजक, येथे खडक असून जमिनीचा पोत, माती कमी असल्याचे दिसले. 

वृक्षारोपण केवळ नावालाचवृक्षारोपणाचा आकडा वाढविण्यासाठी महापालिका कोठेही व कोणत्याही जातीच्या झाडांची लागवड करीत आहेत. परिणामी झाडे तग धरत नाहीत. वेळ, पैसा खर्च होऊनही वृक्षारोपणाचा उद्धेश साध्य होत नाही. हरीत शहराचा निर्धार महापालिकेकडून केला जात असताना आयुक्तांच्या बंगल्यासमोरील झाडे अर्थात हिरवळ धोक्यात आली आहे. आयुक्तांच्या बंगल्यासमोरील दुभाजकातील झाडे जळाली आहेत. महापालिका प्रशासन आणि उद्यान विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

झाडे कोणत्या जातीची आहेत, त्यांचे आयुर्मान, त्यांचा आकार, त्यांच्या मुळांचा विस्तार आदी बाबींचा अभ्यास करूनच वृक्षलागवड झाली पाहिजे. वृक्षारोपण करताना त्यासाठीची जागा, मातीचा पोत, खडक किती अंतरावर आहे याचाही विचार करणे आवश्यक असते. त्यानंतरच शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण करावे. त्यानंतर त्याचे संवर्धनही महत्त्वाचे आहे. - अरुण कांबळे, प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, पुणे

.............

मोरवाडी येथील दुभाजकात बकुळीची झाडे आहेत. दुभाजकाखाली खडक असल्याने त्यांच्या मुळांच्या वाढीवर मयार्दा आली. परिणामी ही झाडे जळाली आहेत. त्याजागी तग धरू शकणारी दुसरी झाडे लावण्यात येणार आहेत. - सुरेश साळुंखे, अधीक्षक, उद्यान विभाग, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcommissionerआयुक्त