शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जीव मुठीत धरूनच होतोय प्रवास, येळसे-शिवली पूल खचला दुतर्फा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:48 IST

पवनमावळ परिसरातील शिवली, ब्राह्मणोली, कडधे आदी पुलांची अवस्था बिकट झाली आहे. येळसे ते शिवली पूल दोन्ही बाजूंनी खचला असून, काही दिवसांपूर्वी एका बाजूने खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जड वाहनास बंदी घालण्याचे फलक लावले होते.

पवनानगर - पवनमावळ परिसरातील शिवली, ब्राह्मणोली, कडधे आदी पुलांची अवस्था बिकट झाली आहे. येळसे ते शिवली पूल दोन्ही बाजूंनी खचला असून, काही दिवसांपूर्वी एका बाजूने खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जड वाहनास बंदी घालण्याचे फलक लावले होते. परंतु पुलाचे कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही. या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबर लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे.येळसे गावातील बहुतेक विद्यार्थी शिवली येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यांना या पुलावरून जीव मुठीत धरून जावे लागत आहे. शिवली, भडवली,काटेवाडी, येलघोल, धनगव्हाण, येवलेवाडी आदी गावांसाठी हा मुख्य रस्ता असून, परिसरातील नागरिकांना मुख्य बाजारपेठ व दळणवळणाची सुविधा पवनानगर (काले कॉलनी) आहे. पुलाच्या दोन्ही बाजू ढासळल्याने नागरिक, चाकरमानी, दूध व्यावसायिक व विद्यार्थी यांना जोखीम पत्करुनच ये-जा करावी लागते. अतिशय धोकादायक झाल्याने लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. ब्राह्मणोली पूल हा जुना असून डागडुजी केलेली नाही. पुलाच्या खालील बाजूचे स्टिल पखराब झाले आहे. पुलावरून पवनानगर ते पौड व आजूबाजूच्या अनेक गावांना जाता येते.पर्यटकांचे हालपवन मावळातील बहुतांश रस्ते दुरवस्थेत आहेत. पुलांचीही तशीच ्रपरिस्थिती आहे. या भागात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. खराब पूल आणि रस्त्यांचा स्थानिकांबरोबर पर्यटकांनाही बसतो. या परिसरात पर्यटकांची संख्या वाढावी या साठी शासनाने कोणत्याही चांगल्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. किमान रस्ते, पूल आणि इतर मूलभूत सुविधा जरी व्यवस्थित दिल्या तरी पर्यटकांना त्रास होणार नाही. पर्यटक संख्या वाढल्याने स्थानिकांच्या व्यवसायास हातभार लागेल. शासनाच्या महसुलातही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाढ होईल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या