शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्रशासनाकडून कचऱ्याचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 02:37 IST

कचरा संकलनाची फेरनिविदा; जुन्या निविदांना केराची टोपली, चार टप्प्यांत विभागणी

पिंपरी : महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून कचरा प्रश्नाचा खेळखंडोबा झाला आहे. निविदांचा खेळ सत्ताधारी भाजपाने मांडला आहे. परिणामी कचरा प्रश्न गंभीर होत आहे. आठ, सहा, दोन आणि चार निविदा असे संशोधन झाल्यानंतर सव्वा वर्षानंतर कचराकोंडी फुटणार आहे. नव्याने चार निविदा मागविल्या आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेत फेब्रुवारी २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. तेव्हापासून कचरा प्रश्नावर सत्ताधारी भाजपा आणि प्रशासन केवळ संशोधन करीत आहेत. सुरुवातीला कचरा संकलन आणि वाहतूक कामाची नव्याने निविदा काढली. त्यासाठी नेत्यांच्या सोईनुसार शहराची दोन भागात विभागणी केली होती. पुणे-मुंबई महामार्ग हा मध्यबिंदू ठरविला होता. कचरा गोळा करणे आणि त्याची मोशी येथील कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम एका संस्थेस २८ कोटी ५२ लाखांना आणि दुसरे काम २७ कोटी ९० लाखांना दिले होते. मात्र, या ठरावास स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी विरोध केला होता. त्या वेळी चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मात्र, हा प्रस्ताव स्थायीने मंजूर केला होता.त्यानंतर तक्रारीची दखल घेत नगरविकास खात्याने महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कक्षातर्फे चौकशी केली. त्यानंतर १० एप्रिलला अहवाल राज्य सरकार आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सादर केला. महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी राबविलेली निविदा प्रक्रिया योग्यच असल्याचा निष्कर्ष चौकशी अहवालात काढला होता. त्यातील दरही योग्य असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र, त्यापूर्वीच महापालिकेतील भाजपाच्या सत्ताधाºयांनी स्थायी समितीच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया रद्दचा निर्णय घेतला होता. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निर्णयाची पाठराखणही केली होती.अंतर्गत कुरघोड्यांचा परिणाम शहरावरकचरा प्रश्नावरून कुरघोड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. त्याचा परिणाम शहरातील आरोग्यावर होत आहे. यास प्रशासनाची दप्तरदिरंगाई कारणीभूत राहिलेली आहे. कचरा संकलन व वाहतूक कामाची निविदा रद्द केल्याचे ७ मेला प्रशासनाने कळविले. दोन ठेकेदारांनी प्रतिटन दर कमी करण्याबाबत आयुक्तांसमवेत पत्रव्यवहार केला. याच वेळी फेरनिविदेसाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती केली, निविदाही प्रसिद्ध केली. मात्र, ऐनवेळी आयुक्तांनी सल्लागार नेमणुकीची निविदा रद्द केली. २४ आॅगस्टला एका सल्लागार संस्थेची थेट पद्धतीने काम दिले. या संस्थेने अ आणि फ क्षेत्रीय कार्यालय (१३ कोटी १७ लाख), ब आणि ड क्षेत्रीय कार्यालय (१५ कोटी ३० लाख), क आणि इ क्षेत्रीय कार्यालय (१० कोटी ९१ लाख) तसेच, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालय (११ कोटी ४२ लाख रुपये) या प्रमाणे चार निविदा आहेत.नाशिक महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी सरासरी प्रतिटन १६४१ रुपये दर निश्चित केला असून पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या कामासाठीही हाच दर गृहीत ठरविला आहे. दोन, आठ, चार असे तीन फॉर्मुले यावर प्रशासन आणि सत्ताधाºयांनी काथ्याकुट केल्यानंतर चार विभागांत हे काम देण्याचा ठराव स्थायी समितीने केला आहे. नवीन कामात निकष ठरविले आहेत. ठेकेदारांवर सर्व वाहने पुरविणे, त्यांची देखभाल - दुरुस्ती करणे, इंधन पुरवठा, मनुष्यबळाची जबाबदारी, कचरा संकलन प्राथमिक कामासाठी १ वाहनचालक व १ सफाई कामगार आवश्यक, जनजागृती करणे, हरित कचºयाची विल्हेवाट लावणे आदींसाठी अतिरिक्त मोबदला मिळणार नाही, आर्थिक उलाढालीच्या निकषावर ठेकेदाराची नेमणूक केली जाणार असल्याचे निकष ठरविण्यात आले आहेत.सरकारने क्लिन चीट देऊनही सत्ताधाºयांनी निर्णय फिरविला होता. त्यानंतर स्थायी समितीने ११ एप्रिलला कचरा संकलन आणि वाहतूक कामाची निविदा रद्द करीत फेरनिविदा काढली. त्यानंतर आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी काम देण्याचे नियोजन केले.कचरा संकलन, वाहतूक कामाची निविदेबाबत आजपर्यंत सर्व निर्णय हे स्थायी समितीने घेतले आहेत. दोन, आठ आणि आता चार विभाग करण्याचा निर्णय आणि विषय हा स्थायी समितीने दिला आहे. त्यानुसार प्रशासन कार्यवाही करीत आहे.- श्रावण हर्डीकर, आयुक्त

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड